शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Modi Cabinet Reshuffle: मोदी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; किरेन रिजिजू यांच्यानंतर एसपी सिंह बघेल यांचाही पदभार काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2023 19:05 IST

Modi Cabinet Reshuffle: आज अचानक मोदी कॅबिनेटने केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांचे मंत्रिपद बदलले आहे.

नवी दिल्ली : आज अचानक मोदी कॅबिनेटमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्याजागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री बनविण्यात आले आहे. त्यांच्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांच्याकडूनही विधी आणि न्याय मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री केले आहे.

केंद्र सरकारचा तडकाफडकी निर्णयकेंद्र सरकारने आज अचानक केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला. रिजिजू यांच्याकडे आता भू विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने रिजिजू यांच्याऐवजी अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. मेघवाल त्यांच्या स्वत:च्या खात्यासह कायदा मंत्री (स्वतंत्र प्रभार) असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ बदलाला मंजुरी दिली आहे. 

निर्णयानंतर विरोधकांचा टोलाकाँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी किरेन रिजिजू यांच्याकडे कायदा मंत्रालयाऐवजी भूविज्ञान मंत्रालय सोपवल्याबद्दल टोमणा मारला आहे. किरेन रिजिजू यांच्यावर हल्ला करताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, केंद्राने अखेर सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे ऐकून घेतले आणि रिजिजू यांना शिक्षा केली. हा निर्णय म्हणजे न्यायाचा विजय आहे. तर रिजिजू अयशस्वी मंत्री असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी केली.

कॉलेजियमवरुन वादकिरेन रिजिजू गेल्या काही काळापासून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. गेल्या वर्षी सात नोव्हेंबरला त्यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजिअम सिस्टिम संविधानासाठी एलियन असल्याचे म्हटले होते. कॉलेजिअम सिस्टिममध्ये त्रुटी आहेत आणि लोक त्यावर आवाज उठवत आहेत. यानंतर त्यांनी निवृत्त जज आणि अॅक्टिव्हिस्ट हे भारत विरोधी संघटना आहेत, असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार