शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:36 IST

Mock Drill : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (७ मे) देशभरात मॉकड्रिल होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात सामील असणाऱ्या ४ आतंकवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी असल्याचे समोर आले. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान भारताकडूनयुद्धाची तयारी केली जात आहे. भारतीय सेना, वायुदल आणि नौसेनेकडून युद्धाभ्यास केला जात आहे. तर, याच पार्श्वभूमीवर ७ मे रोजी देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. 

भारत सरकारने युद्धाच्या आधी होणाऱ्या मॉकड्रिलचे आदेश दिले आहेत. उद्या म्हणजेच ७ मे रोजी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे.एकीकडे भारतीय या मॉकड्रिलसाठी सज्ज झाले आहेत. तर, दुसरीकडे १९६५ आणि १९७१मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. १९६५ आणि १९७१च्या युद्धाआधी देखील देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले होते. त्यावेळी मॉकड्रिलमध्ये काय काय झालं होतं?  दोन्ही युद्धाआधी काय घडलेलं?भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी मीडियाशी बोलताना युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील आठवणी सांगताना ते म्हणाले,"१९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले आणि युद्धादरम्यान जेव्हा जेव्हा सायरन वाजायचा, तेव्हा लोक घाबरून त्यांच्या घरात लपायचे. वीजपुरवठा खंडित होताच लोकांमध्ये चेंगराचेंगरी व्हायची. ते जमिनीवर पडून रात्रभर पहारा देत असायचे. घरांच्या भिंती आणि खिडक्या काळ्या रंगात रंगवल्या होत्या जेणेकरून शत्रूने त्यावर प्रकाश टाकला, तरी त्यांना काहीही दिसणार नाह. युद्धामुळे शाळा बंद होत्या. लोक एकत्र मिळून पहारा द्यायचे. कुणाच्याही घरात थोडासा प्रकाश दिसला तर, तो लगेच बंद केला जायचा. विमान दिसताच लोक ओरडू लागायचे."

एअर रेड सायरन आणि ब्लॅक आऊट म्हणजे काय?युद्धाच्या दरम्यान वाजणारे एअररेड सायरन हे एखाद्या फॅक्टरीमध्ये वाजणाऱ्या सायरनसारखेच असतात. सरकारच्यावतीने हे सायरन जागोजागी लावले जातात. सायरन वाजू लागताच लोक सतर्क व्हायचे. या युद्ध काळात सगळीकडे लख्ख काळोख केला जायचा,यालाच ब्लॅक आऊट म्हणतात. एखादा दिवा पेटवायचा असल्यास खिडक्यांना काळा रंग दिला जायचा. यामुळे शत्रूसेनेपासून स्वतःचा बचाव करता येत होता. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्येही लोकांना याच आवश्यक गोष्टींची माहिती दिली जाणार आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwarयुद्ध