शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:36 IST

Mock Drill : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (७ मे) देशभरात मॉकड्रिल होणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या दहशतवादी हल्ल्यात सामील असणाऱ्या ४ आतंकवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी असल्याचे समोर आले. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान भारताकडूनयुद्धाची तयारी केली जात आहे. भारतीय सेना, वायुदल आणि नौसेनेकडून युद्धाभ्यास केला जात आहे. तर, याच पार्श्वभूमीवर ७ मे रोजी देशभरात मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. 

भारत सरकारने युद्धाच्या आधी होणाऱ्या मॉकड्रिलचे आदेश दिले आहेत. उद्या म्हणजेच ७ मे रोजी देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे.एकीकडे भारतीय या मॉकड्रिलसाठी सज्ज झाले आहेत. तर, दुसरीकडे १९६५ आणि १९७१मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. १९६५ आणि १९७१च्या युद्धाआधी देखील देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले होते. त्यावेळी मॉकड्रिलमध्ये काय काय झालं होतं?  दोन्ही युद्धाआधी काय घडलेलं?भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनी मीडियाशी बोलताना युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील आठवणी सांगताना ते म्हणाले,"१९७१ मध्ये जेव्हा पाकिस्तानशी युद्ध झाले आणि युद्धादरम्यान जेव्हा जेव्हा सायरन वाजायचा, तेव्हा लोक घाबरून त्यांच्या घरात लपायचे. वीजपुरवठा खंडित होताच लोकांमध्ये चेंगराचेंगरी व्हायची. ते जमिनीवर पडून रात्रभर पहारा देत असायचे. घरांच्या भिंती आणि खिडक्या काळ्या रंगात रंगवल्या होत्या जेणेकरून शत्रूने त्यावर प्रकाश टाकला, तरी त्यांना काहीही दिसणार नाह. युद्धामुळे शाळा बंद होत्या. लोक एकत्र मिळून पहारा द्यायचे. कुणाच्याही घरात थोडासा प्रकाश दिसला तर, तो लगेच बंद केला जायचा. विमान दिसताच लोक ओरडू लागायचे."

एअर रेड सायरन आणि ब्लॅक आऊट म्हणजे काय?युद्धाच्या दरम्यान वाजणारे एअररेड सायरन हे एखाद्या फॅक्टरीमध्ये वाजणाऱ्या सायरनसारखेच असतात. सरकारच्यावतीने हे सायरन जागोजागी लावले जातात. सायरन वाजू लागताच लोक सतर्क व्हायचे. या युद्ध काळात सगळीकडे लख्ख काळोख केला जायचा,यालाच ब्लॅक आऊट म्हणतात. एखादा दिवा पेटवायचा असल्यास खिडक्यांना काळा रंग दिला जायचा. यामुळे शत्रूसेनेपासून स्वतःचा बचाव करता येत होता. उद्या होणाऱ्या मॉकड्रिलमध्येही लोकांना याच आवश्यक गोष्टींची माहिती दिली जाणार आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwarयुद्ध