शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मोबाईल रिचार्ज महागली, ज्योतिरादित्य शिंदेंच्या संसदेतील उत्तराने नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:47 IST

Mobile Recharge Rate Hike: महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली.

जुलैच्या सुरुवातीला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि नंतर व्होडाफोन-आयडियाने मोबाईल रिचार्जच्या किंमती अव्वाचे सव्वा करून ठेवल्या. यामुळे आधीच महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली. तर बहुतांश लोकांनी महागडी रिचार्ज मारण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टेलिकॉम मिनिस्टर ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

शिंदेंचे स्पष्टीकरण ऐकून नेटकरी चांगलेच वैतागलेले दिसले. आधीच महागड्या रिचार्जमुळे त्रस्त असलेले लोक शिंदेंचे महागलेल्या रिचार्जवरील युक्तीवाद ऐकून आणखी त्रस्त झाले आहेत. भारत अशा देशांच्या यादीत आहे जिथे जगभराच्या तुलनेत आजही मोबाईल कॉल आणि इंटरनेट सर्वात स्वस्त आहे, असे शिंदे यांनी संसदेत सांगितले. 

भारतातील मोबाईल कॉल रेट जगापेक्षा सर्वात कमी आहे. भारतात ५३ पैसे प्रति मिनिट असा कॉल रेट आहे. यातही सध्या तीन पैशांची कपात करण्यात आली आहे. याप्रकारे कॉल रेटमध्ये ९३ टक्क्यांची घसरण झालेली आहे. म्हणजेच कॉलिंग करणे स्वस्त झाले आहे. तसेच भारतात १ जीबी इंटरनेटचा दरही सर्वात कमी आहे. रिपोर्टनुसार १ जीबीसाठी ९.१२ रुपये लागतात, असे सरकारचे म्हणणे आहे. या माहितीनंतर नेटकरी संतापले आहेत व वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

भारतात ११७ कोटी मोबाईल युजर्स आहेत. तर ९३ कोटी लोक इंटरनेट वापरतात. २०२२ नुसार भारतात एकूण १४१.७२ कोटी युजर्स आहेत. म्हणजेच देशातील अधिकतर लोकसंख्येकडे मोबाईल आहे. मार्च २०२४ च्या आकडेवारीनुसार भारतात 954.4 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. 

देशातील 6,44,131 गावांमध्ये 298 दशलक्ष युजर्स आहेत. यापैकी 6,12,952 गावांमध्ये 3G आणि 4G कनेक्टिविटी आहे. म्हणजेच ९५.५ टक्के गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. मार्च २०१४ मध्येच देशातील एकूण इंटरनेट वापरकर्ते 251.5 दशलक्ष झाले होते.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAirtelएअरटेलJioजिओBSNLबीएसएनएल