शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मोबाईल रिचार्ज महागली, ज्योतिरादित्य शिंदेंच्या संसदेतील उत्तराने नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:47 IST

Mobile Recharge Rate Hike: महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली.

जुलैच्या सुरुवातीला रिलायन्स जिओ, एअरटेल आणि नंतर व्होडाफोन-आयडियाने मोबाईल रिचार्जच्या किंमती अव्वाचे सव्वा करून ठेवल्या. यामुळे आधीच महागाईत पिचलेल्या लोकांचा तिळपापड झाला आणि अनेकांनी तुलनेने खूपच स्वस्त असलेल्या बीएसएनएलकडे धाव घेतली. तर बहुतांश लोकांनी महागडी रिचार्ज मारण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर टेलिकॉम मिनिस्टर ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

शिंदेंचे स्पष्टीकरण ऐकून नेटकरी चांगलेच वैतागलेले दिसले. आधीच महागड्या रिचार्जमुळे त्रस्त असलेले लोक शिंदेंचे महागलेल्या रिचार्जवरील युक्तीवाद ऐकून आणखी त्रस्त झाले आहेत. भारत अशा देशांच्या यादीत आहे जिथे जगभराच्या तुलनेत आजही मोबाईल कॉल आणि इंटरनेट सर्वात स्वस्त आहे, असे शिंदे यांनी संसदेत सांगितले. 

भारतातील मोबाईल कॉल रेट जगापेक्षा सर्वात कमी आहे. भारतात ५३ पैसे प्रति मिनिट असा कॉल रेट आहे. यातही सध्या तीन पैशांची कपात करण्यात आली आहे. याप्रकारे कॉल रेटमध्ये ९३ टक्क्यांची घसरण झालेली आहे. म्हणजेच कॉलिंग करणे स्वस्त झाले आहे. तसेच भारतात १ जीबी इंटरनेटचा दरही सर्वात कमी आहे. रिपोर्टनुसार १ जीबीसाठी ९.१२ रुपये लागतात, असे सरकारचे म्हणणे आहे. या माहितीनंतर नेटकरी संतापले आहेत व वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

भारतात ११७ कोटी मोबाईल युजर्स आहेत. तर ९३ कोटी लोक इंटरनेट वापरतात. २०२२ नुसार भारतात एकूण १४१.७२ कोटी युजर्स आहेत. म्हणजेच देशातील अधिकतर लोकसंख्येकडे मोबाईल आहे. मार्च २०२४ च्या आकडेवारीनुसार भारतात 954.4 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. 

देशातील 6,44,131 गावांमध्ये 298 दशलक्ष युजर्स आहेत. यापैकी 6,12,952 गावांमध्ये 3G आणि 4G कनेक्टिविटी आहे. म्हणजेच ९५.५ टक्के गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. मार्च २०१४ मध्येच देशातील एकूण इंटरनेट वापरकर्ते 251.5 दशलक्ष झाले होते.  

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेAirtelएअरटेलJioजिओBSNLबीएसएनएल