शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये ठाकोर समुदायाच्या मुलींना मोबाइल बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 05:37 IST

अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे.

पालनपूर : अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे. एवढेच नाही, तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना दीड ते दोन लाख रुपयांचा दंड करण्याचे फर्मानही सोडले आहे.या जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातल्या १२ गावांतल्या ठाकोर समुदायातील ज्येष्ठ सदस्यांच्या १४ जुलैला झालेल्या बैठकीत एकमताने हे निर्णय घेण्यात आले. या अन्यायकारक निर्णयांचे वाव तालुक्यातील काँग्रेसच्या आमदार गनिबेन ठाकोर यांनी उघड समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, अविवाहित मुलींनी मोबाइल फोन वापरण्यावर घातलेली बंदी अजिबात चुकीची नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टींपासून या मुलींनी लांबच राहिले पाहिजे व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे.ठाकोरांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, या समुदायातील अविवाहित मुली मोबाइल फोन वापरताना पकडल्या गेल्या, तर त्यासाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरण्यात येईल. महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया मुलींना मोबाइल देऊ नका. त्यामुळे मोबाइलच्या नादी लागून त्या वेळ वाया घालविणार नाहीत. त्याऐवजी या मुली अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करतील. ठाकोर समुदायातील जी मुले-मुली आंतरजातीय विवाह करतील, त्यांच्या पालकांना दीड ते दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल.दांतीवाडा येथील ठाकोरांचे एक नेते सुरेश ठाकोर यांनी सांगितले की, महाविद्यालयीन युवक-युवती मोबाइलवर नानाप्रकारचे व्हिडीओ तयार करत असतात. मोबाइल वापरण्यास बंदी केल्यानंतर या युवक-युवतींना लॅपटॉप, टॅबलेट देण्याचा ठाकोरांचा विचार आहे. या साधनांचा उपयोग हे विद्यार्थी अभ्यासासाठी करतील.>लग्नामध्ये डीजे,फटाके वाजविण्यास मनाईत्यातून वाचलेला पैसा या समुदायातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला जाणार आहे. या निर्णयांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काँग्रेसचे आणखी एक आमदार अल्पेश ठाकोर यांनाही या निर्णयामध्ये काहीही वावगे वाटत नाही.>ठाकोर समुदायात होणाºया लग्नांवर होणारा अव्वाच्या सव्वा खर्चात कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. लग्नामध्ये डीजे आणणे, फटाके वाजविणे, पैशाची उधळपट्टी करत वरात काढणे या गोष्टींवर ठाकोरांनी बंदी घातली आहे.