शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

माहिती प्रसारण मंत्रालय; मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये चार मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 13:34 IST

गेल्या चार वर्षांच्या काळामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार चार नेत्यांकडे देण्यात आलेला आहे.

नवी दिल्ली- काल पुन्हा एकदा भारताला नवे माहिती आणि प्रसारण मंत्री मिळाले आहेत. स्मृती इराणी यांच्याकडे आता केवळ वस्रोद्योग मंत्रालयाचा पदभार ठेवण्यात आला आहे. केंद्रामध्ये 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 2016 साली त्यांच्याकडचे हे खाते काढून घेण्यात आले व त्याची जबाबदारी प्रकाश जावडेकर यांच्याकडे देण्यात आली. 2016 पासून स्मृती इराणी वस्त्रोद्योग मंत्री झाल्या. भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्यानंतर त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेस या मंत्रालायचा अतिरिक्त पदभार स्मृती इराणी यांच्याकडे देण्यात आला. आता तो पदभारही काढून घेण्यात आला.सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यांनी 1946 ते 1947 या काळासाठी त्यांनी या खात्याचा पदभार सांभाळला. त्यांच्यानंतर तीन वर्षे आर.आर. दिवाकर यांनी ही जबाबदारी सांभाळली. तर बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे या खात्याचे पहिले मराठी मंत्री झाले. सर्वाधीक काळ त्यांना या खात्याची जबाबदारी पाहिली आहे.1952  ते 1962 असे दशकभर त्यांनी मंत्रालय सांभाळले , त्यानंतर सत्यनारायण सिंह यांनी एक वर्षभर या खात्याची जबाबदारी घेतली. 1964 साली इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या खात्याची जबाबदारी सांभाळली होती. 1964 ते 1966 या काळामध्ये त्या खात्याच्या मंत्री होत्या. त्यांच्याप्रमाणे इंद्रकुमार गुजराल सुद्धा 1975 साली माहिती प्रसारण मंत्री होते. इंदिरा गांधी आणि इंदरकुमार गुजराल हे नंतरच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधानही झाले. चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांनी माहिती प्रसारण मंत्रालय स्वतःकडेच ठेवले होते. केसकर यांच्यानंतर वसंत साठे आणि विठ्ठलराव गाडगीळ या मराठी नेत्यांनी माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीही माहिती प्रसारण मंत्रालय होते.  एच. के. एल भगत, अरुण जेटली, जयपाल रेड्डी यांना या मंत्रालयाची दोन वेळा जबाबदारी मिळाली आहे. लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांनीही या मंत्रालयाचे नेतृत्त्व केले आहे.2014 साली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यावर प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी मिळाले. त्यानंतर अरुण जेटली यांनी दोन वर्षांसाठी मंत्रालय सांभाळले. त्यानंतर एका वर्षासाठी व्यंकय्या नायडू माहिती प्रसारण मंत्री झाले. त्यांनी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याचे निश्चित केल्यावर स्मृती इराणी यांच्याकडे पदभार आला आणि आता काल राजवर्धनसिंह राठोड या मंत्रालयाचे कामकाज पाहतील असा निर्णय घेण्यात आला. बाळकृष्ण केसकर सोडल्यास फार कमी नेत्यांना प्रदीर्घकाळ या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळायला मिळाली आहे. सलग पाच वर्षांची टर्म त्यांच्यानंतर (कोडरदास शाह अपवाद) कोणालाच मिळालेली नाही. 

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयSmriti Iraniस्मृती इराणी