शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

राज्यमंत्र्यांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: July 25, 2016 04:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत

हरीश गुप्ता ल्ल ,  दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरा तोडत केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांना भरीव काम देऊ केले असून, अनेक फायली आता त्यांच्यामार्फत हातावेगळ््या केल्या जात आहेत. मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारानंतर पंतप्रधान कार्यालयाने कॅबिनेट व राज्यमंत्र्यांच्या कामाची काटेकोर आखणी करून दिली आहे. ज्येष्ठ मंत्र्यांच्या हाताखाली कनिष्ठ मंत्र्यांना शिकण्याची संधी मिळावी व त्यांच्यात भविष्यात नेतृत्त्व करण्याचे गुण बाणविले जावेत यासाठी मोदींनी राज्यमंत्र्यांनाही निश्चित कामे वाटून दिली आहेत.पंतप्रधानांच्या कार्यालयाने २६ कॅबिनेटमंत्र्यांना असे स्पष्ट संकेत दिले आहेत की, पंतप्रधानांशी संपर्क साधल्याशिवाय त्यांनी कोणतेही कामाचे वाटप करू नये. अर्थात, अनेक मंत्री आपल्या राज्यमंत्र्यांना पुरेसे काम देत नाहीत, हेही त्यांना माहीत आहे व त्यासाठी या कॅबिनेटमंत्र्यांनी पावले उचलणे पंतप्रधानांना अभिप्रेत आहे. अनेक राज्यमंत्र्यांना अजून त्यांच्या कामासंदर्भात रीतसर आदेशच हाती पडायचा आहे. प्रत्येक कॅबिनेटमंत्र्याने आपल्या राज्यमंत्र्याला काय काम दिले, याची माहिती पीएमओला देणे अपेक्षित आहे व त्याबाबत साऊथ ब्लॉकच्या निर्णयाची वाट पाहणे क्रमप्राप्त आहे. याबाबत अनेक मंत्र्यांनी पाठवलेल्या फायली परतही आलेल्या आहेत, तर काहींना त्याची प्रतीक्षा आहे.तथापि, गृह, संरक्षण, नागरी हवाई वाहतूक, रसायने व खते, संसदीय कार्य या प्रमुख खात्यांसह, अनंत गीते, हरसिमरत कौर बादल, जुअल ओरान, राधामोहनसिंग, थावरचंद गेहलोत व हर्षवर्धन यांना फारशी समस्या येण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांची संख्या फारशी बदललेली नाही. आधीचे राज्यमंत्री बदलले किंवा वगळले आणि त्यांच्या जागी दुसरे आले तर कामाचे वाटप तसेच राहते, परंतु वित्त (अरुण जेटली), रेल्वे (सुरेश प्रभू), रस्ते वाहतूक व जहाजबांधणी (नितीन गडकरी), लघु, मध्यम उद्योग (कलराज मिश्र), आरोग्य (जे.पी. नड्डा) मंत्रालयांना जास्तीचे राज्यमंत्री देण्यात आले आहेत. यापैकी काहींना अडचण येण्याची शक्यता आहे.अरुण जेटली यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासाठी राज्यमंत्री देण्यात आले आहेत. त्यांच्या खात्याचे दोन्ही राज्यमंत्री संतोष गंगवार आणि अर्जुन राम मेघवाल हे खासकरून हिंदीभाषी आहेत. उच्चस्तरीय मंडळे, शिष्टमंडळे आणि आंतरराष्ट्रीय संघटना, परिषदांशी जुळवून घेण्यास त्यांना वेळ लागत आहे. तथापि, दोघेही खूश आहेत. सुषमा स्वराज या बाबतीत फारच आघाडीवर आहेत. त्यांनी आपल्या परराष्ट्रव्यवहार खात्याच्या कामाचे तातडीने वाटप करून एम.जे. अकबर यांना समाधानकारक काम दिले, तसेच अनेक वाद उभे करणारे जन. व्ही. के. सिंग यांनाही अतिरिक्त काम दिले. रसायने आणि खते मंत्रालयातून गृहमंत्रालयात आलेले हंसराज अहीर यांना राजनाथसिंग यांनी हवे ते काम दिले आहे.