शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय ...


महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा

नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यत ३ लाख ४६ हजारावर कर्मचाऱ्यांना त्यांचा ईपीएफचा पैसा मिळाला नव्हता. २०११-१२ मध्ये ५.८७, २०१२-१३ मध्ये २.७४ आणि २०१३-१४ मध्ये ईपीएफ दाव्यांची २.३२ लाख प्रकरणे प्रलंबित होती. कर्मचाऱ्यांनी ईपीएफचा दावा केल्यानंतर ३० दिवसात त्यांना त्यांचा पैसा परत मिळणे आवश्यक आहे. परंतु आपला विभाग किमान दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये अर्ज दिल्यानंतर केवळ १० दिवसात दावेदारास रक्कम देण्याच्या स्थितीत आहे,असा दावा दत्तात्रय यांनी केला. लोकसभेत खासदार चंद्रप्रकाश जोश्ी यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. ईपीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ईपीएफच्या प्रतीक्षा यादीतील सर्वाधिक कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी २८ फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्रात ईपीएफच्या कार्यालयात ९७,६०४ कर्मचारी आपला पैसा परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या वर्षी हा आकडा फक्त ६७,६५१ आणि २०१२-१३ मध्ये ४५,१३० होता. २०११-१२ च्या अखेरीस १,६७,३७६ कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित होते. (प्रतिनिधी)