शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय ...


महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा

नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यत ३ लाख ४६ हजारावर कर्मचाऱ्यांना त्यांचा ईपीएफचा पैसा मिळाला नव्हता. २०११-१२ मध्ये ५.८७, २०१२-१३ मध्ये २.७४ आणि २०१३-१४ मध्ये ईपीएफ दाव्यांची २.३२ लाख प्रकरणे प्रलंबित होती. कर्मचाऱ्यांनी ईपीएफचा दावा केल्यानंतर ३० दिवसात त्यांना त्यांचा पैसा परत मिळणे आवश्यक आहे. परंतु आपला विभाग किमान दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये अर्ज दिल्यानंतर केवळ १० दिवसात दावेदारास रक्कम देण्याच्या स्थितीत आहे,असा दावा दत्तात्रय यांनी केला. लोकसभेत खासदार चंद्रप्रकाश जोश्ी यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. ईपीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ईपीएफच्या प्रतीक्षा यादीतील सर्वाधिक कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी २८ फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्रात ईपीएफच्या कार्यालयात ९७,६०४ कर्मचारी आपला पैसा परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या वर्षी हा आकडा फक्त ६७,६५१ आणि २०१२-१३ मध्ये ४५,१३० होता. २०११-१२ च्या अखेरीस १,६७,३७६ कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित होते. (प्रतिनिधी)