शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

लाखो कर्मचारी करीत आहेत ईपीएफ दाव्याची प्रतीक्षा

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय ...


महाराष्ट्रात सर्वाधिक संख्या: प्रक्रिया सुलभ केल्याचा दावा

नवी दिल्ली- रक्ताचे पाणी करून कमविलेल्या पैशातील मोठा हिस्सा भविष्य निर्वाह निधीत (ईपीएफ) जमा केल्यानंतर दावा मंजूर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्यांची यादी गेल्या तीन वर्षांपासून लांबलचक होत चालली आहे. परंतु सरकार मात्र परिस्थितीत सुधारणा असल्याचा दावा करीत आहे.
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान आर्थिक वर्षात २८ फेब्रुवारीपर्यत ३ लाख ४६ हजारावर कर्मचाऱ्यांना त्यांचा ईपीएफचा पैसा मिळाला नव्हता. २०११-१२ मध्ये ५.८७, २०१२-१३ मध्ये २.७४ आणि २०१३-१४ मध्ये ईपीएफ दाव्यांची २.३२ लाख प्रकरणे प्रलंबित होती. कर्मचाऱ्यांनी ईपीएफचा दावा केल्यानंतर ३० दिवसात त्यांना त्यांचा पैसा परत मिळणे आवश्यक आहे. परंतु आपला विभाग किमान दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये अर्ज दिल्यानंतर केवळ १० दिवसात दावेदारास रक्कम देण्याच्या स्थितीत आहे,असा दावा दत्तात्रय यांनी केला. लोकसभेत खासदार चंद्रप्रकाश जोश्ी यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. ईपीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.
ईपीएफच्या प्रतीक्षा यादीतील सर्वाधिक कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी २८ फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्रात ईपीएफच्या कार्यालयात ९७,६०४ कर्मचारी आपला पैसा परत मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. गेल्या वर्षी हा आकडा फक्त ६७,६५१ आणि २०१२-१३ मध्ये ४५,१३० होता. २०११-१२ च्या अखेरीस १,६७,३७६ कर्मचाऱ्यांचे दावे प्रलंबित होते. (प्रतिनिधी)