शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अरुणाचल प्रदेशात चीनच्या उचापती थांबविण्यासाठी लष्कराची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 06:33 IST

लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. 

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत आणि चीन सीमा परस्परांना भिडल्या आहेत. या प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर सध्या तणावाची स्थिती आहे. चीन सातत्याने भारताच्या कुरापती काढत आहे. लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. तयारी काय?अरुणाचल प्रदेशालत चीनची सीमारेषा १३५० किमी लांबीची आहे. या सर्व ठिकाणी भारतीय लष्कराने पक्के रस्ते तयार केले असून सुरूंगांची पेरणी केली आहे. इस्रायलकडून मिळालेल्या ड्रोनने येथील सीमारेषेवर टेहळणी केली जाते. त्यामुळे चिनी लष्कराच्या बारिकसारिक हालचाली सहज टिपता येतात.जय्यत तयारीनेचिफू आणि सेला पास या ठिकाणी रस्त्यांचे जाळे उभारले जात असून विनाअडथळा तेथे जाता येणार आहे.पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत दोन्ही ठिकाणचे रस्ते तयार होतील. तवांग ते शेरगाव हा वेस्टर्न ॲक्सेस रोडही निर्माणाधीन अवस्थेत आहे. तवांगला रेल्वे नेटवर्कने जोडण्याची योजनाही आहे.  पुलांची उभारणीअरुणाचलमध्ये सीमावर्ती भागापर्यंत पोहोचण्यासाठी सीमा रस्ते संस्थेतर्फे (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) अनेक रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. सुमारे २० पुलांची उभारणीही केली जात आहे. लष्करी चिलखती गाड्या, रणगाडे, इतर वाहने यांचा भार तोलू शकतील अशा पद्धतीने या पुलांची उभारणी होत आहे. बॅटलफील्ड ट्रान्सफरन्सीयुद्धभूमीपर्यंत लष्कराला तातडीने पोहोचता यावे यासाठी रस्त्यांचे जाळे विणणे सुरू असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. लष्कराच्या ५ माऊंटन डिव्हिजनकडे भूतानच्या पश्चिमेकडील सीमावर्ती भागापर्यंत टेहळणी करण्याची जबाबदारी आहे. ही डिव्हिजन सदैव सज्ज असून कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तय्यार आहे, असे डिव्हिजनच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव