शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य, शस्त्रांची जमावजमव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 08:30 IST

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याने सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघ करत आहे. अशातच पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जादाचे लष्कराच्या तुकड्या आणि शस्त्रास्त्रे जमविण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा क्षेत्राशी संबंधीत सुत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहीती दिली आहे. 

पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसत हल्ल्याचा प्रयत्न केला. याला प्रत्यूत्तर देताना पाकचे एफ-16 आणि भारताचे मिग 21 बायसन ही विमाने पडली. यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले असून भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. यामुळे तणावाखाली असलेल्या पाकिस्तानने सैन्याची जमावजमव सुरु केली आहे. 

अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानने लष्कराच्या तुकड्या आणि युद्धसामुग्री तैनात केली होती. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानने तेथील तुकड्या आणि शस्त्रास्त्रे एलओसीवर हलविली आहेत. पाकिस्तानच्या या हालचालींवर भारताने आक्षेप नोंदविला असून एलओसीवरील रहिवाशी भागाला लक्ष्य केल्यास पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. 

पाकिस्तानने बुधवारी मध्यरात्रापासून नौशेरा सेक्टरमध्ये जोरदार गोळाबार केला होता. यावेळी त्यांनी भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. 155 एमएम आर्टिलरी गनमधून गोळाबार केला. यानंतर भारताच्या जवानांनीही त्यांना बोफोर्स तोफांद्वारे तोफगोळे डागून प्रत्त्यूत्तर दिले. यानंतर दोन्ही बाजुच्या लष्काराच्या अधिकाऱ्यांनी हॉटलाईनवर चर्चा केली. यावेळी भारताच्या रहिवाशी भागाला लक्ष्य न करण्याचे बजावण्यात आले आहे. 

भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्यांनुसार पाकिस्तानी लष्कराने बुधवारी कृष्णाघाटी आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये सैन्याच्या चौक्या आणि रहिवाशी भागात गोळीबार केला. यावेळी मोर्टारही डागण्यात आले. या गोळीबारात कोणतेही नुकसान झालेले नसले तरीही भारतानेही जोरदार प्रत्यूत्तर दिल्याचे म्हटले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये दोन्ही बाजुंकडून गोळीबार तीन तास सुरू राहिला त्यात एक जवान जखमी झाला. कृष्णा घाटीत गोळीबार सकाळी सहा ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू होता. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार सुरू होऊन बुधवारी पहाटे साडेचारला थांबला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान