शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘मिग-२९’ विमानांमुळे हवाई दलास नवे बळ; पाच मिनिटांत झेप घेण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 00:17 IST

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोलाचे स्थान असलेली ‘मिग-२९’ विमाने अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर अधिक बलशाली आणि भेदक झाल्याने हवाई दलास नवे बळ मिळाले आहे.

आदमपूर (जालंधर): भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोलाचे स्थान असलेली ‘मिग-२९’ विमाने अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर अधिक बलशाली आणि भेदक झाल्याने हवाई दलास नवे बळ मिळाले आहे. खास करून हवाई दलास लढाऊ विमानांचा तुटवडा असताना हे नवे शक्तिस्थान आश्वासक आहे.आदमपूर हा हवाई दलाचा ‘मिग-२९’ विमानांचा सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेला महत्त्वाचा तळ आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या हवाईदल दिनानिमित्त या हवाईदल तळावरील फ्लाईट लेफ्टनंट किरण कोहली यांनी ‘मिग-२९’ विमाने आता कशी अधिक सक्षम झाली आहेत, याची माहिती दिली.हवाई दलाच्या एका स्वाड्रनमध्ये १६ ते १८ लढाऊ विमाने असतात. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी अलीकडेच सांगितले होते की, या सशस्त्र दलास लढाऊ विमानांच्या तुटवड्याची मोठी समस्या भेडसावत आहे. हवाई दलासाठी ४२ स्वाड्रन मंजूर आहेत; पण त्यापैकी फक्त ३१ स्वाड्रन कार्यरत आहेत. पूर्ण ४२ स्वाड्रन असल्या तरी चीन व पाकिस्तान या दोन शेजारी देशांच्या एकत्रित क्षमतेहून त्या खूपच कमी आहेत, असे हवाई दलप्रमुख म्हणाले होते.या पार्श्वभूमीवर ‘मिग-२९’ विमाने अधिक बलशाली व भेदक होणे आश्वासक आहे. मूळ रशियन बनावटीची ही विमाने आता हवेत उड्डाण करीत असतानाच इंधन भरून घेण्यास, अत्याधुनिक क्षेपणास्त्रे वाहून नेऊन त्यांचा विविध दिशांना अचूक मारा करण्यास सक्षम झाली आहेत. भारतीय हवाई दलात ‘मिग-२९’ लढाऊ विमानांच्या एकूण तीन स्वाड्रन असून त्यापैकी दोन आदमपूर तळावर आहेत. पाकिस्तान सीमेपासून सुमारे १०० किमी व चीन सीमेपासून २५० किमी अंतरावर असलेला हा तळ सामरिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहे. फ्लाईट लेक्टनंट कोहली म्हणाले की, सुधारित ‘मिग-२९’ विमाने अधिक सफाईदार कसरती करू शकत असल्याने त्यांचा हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर व हवेतून समुद्रातील जहाजांवरही हल्ला करण्यास अधिक प्रभावी उपयोग केला जाऊ शकतो. शिवाय ही विमाने उड्डाण करत असतानाच इंधन भरून घेऊ शकत असल्याने ती अधिक दूरवरचा पल्ला गाठू शकतात.आणखी एका हवाई दल अधिकाºयाने सांगितले की, ही विमाने सरळ झेप घेऊ शकत असल्याने त्यांना मोठी धावपट्टी लागत नाही. शत्रूच्या विमानाने भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्याचे लक्षात येताच ती पाच मिनिटांत उड्डाण करून लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल