शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एमआय-17 अपघात : हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे गेला 7 जणांचा जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 22:07 IST

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता.

नवी दिल्ली/श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हा हल्ला हाणून पाडला होता. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताविषयी धक्कादायक खुलासा झाला असून, एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये असलेल्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने  केलेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ॉ

हवाई दलातील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार एटीसी टॉवरमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाने सुरुवातीला एमआय-17 चॉपरला तळावर परतण्यास ग्रीन सिग्नल दाखवला होता. मात्र दुसरीकडे एअर डिफेंस युनिटला एअरबेसवर कुठलेही विमान उतरणार नसल्याची सूचना दिली होती. एमआय-17 चॉपर एका मोहिमेवर जात असताना या अधिकाऱ्याने त्याला परत श्रीनगर येथील एअर बेसवर परतण्यास सांगितले होते. तर एअर डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी आपले कुठले विमान किंवा हेलिकॉप्टर  एअर बेसवर येत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या अधिकाऱ्याने आपले कुठलेही चॉपर किंवा एअरक्राफ्ट बेसवर येत नसल्याचे सांगितले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.  या प्रकरणी याआधी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली आहे. मात्र ट्रायलला सामोरे जात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक साक्षीदारांची तपासणी व्हावी अशी मागणी केल्याने पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यासह एअर बेसवरील डिफेन्समध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचेही कोर्टमार्शल होण्याची शक्यता आहे.   27 फेब्रुवारी श्रीनगरजवळ लष्कराचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. पाकिस्तानने एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्याच्या केलेल्या प्रयत्नांदरम्यानच हा अपघात झाला होता.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर