शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

एमआय-17 अपघात : हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे गेला 7 जणांचा जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 22:07 IST

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता.

नवी दिल्ली/श्रीनगर - पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटवर एअरस्ट्राइक करून घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण दक्ष असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांनी हा हल्ला हाणून पाडला होता. मात्र या आणीबाणीच्या परिस्थितीत हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन सहा जवानांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या अपघाताविषयी धक्कादायक खुलासा झाला असून, एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये असलेल्या हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने  केलेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ॉ

हवाई दलातील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार एटीसी टॉवरमध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाने सुरुवातीला एमआय-17 चॉपरला तळावर परतण्यास ग्रीन सिग्नल दाखवला होता. मात्र दुसरीकडे एअर डिफेंस युनिटला एअरबेसवर कुठलेही विमान उतरणार नसल्याची सूचना दिली होती. एमआय-17 चॉपर एका मोहिमेवर जात असताना या अधिकाऱ्याने त्याला परत श्रीनगर येथील एअर बेसवर परतण्यास सांगितले होते. तर एअर डिफेन्सच्या अधिकाऱ्यांनी आपले कुठले विमान किंवा हेलिकॉप्टर  एअर बेसवर येत आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या अधिकाऱ्याने आपले कुठलेही चॉपर किंवा एअरक्राफ्ट बेसवर येत नसल्याचे सांगितले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.  या प्रकरणी याआधी कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाली आहे. मात्र ट्रायलला सामोरे जात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिक साक्षीदारांची तपासणी व्हावी अशी मागणी केल्याने पुन्हा तपास सुरू झाला आहे. या प्रकरणी एअर ट्रॅफीक कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्यासह एअर बेसवरील डिफेन्समध्ये तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याचेही कोर्टमार्शल होण्याची शक्यता आहे.   27 फेब्रुवारी श्रीनगरजवळ लष्कराचे एमआय-17 व्ही5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. पाकिस्तानने एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्याच्या केलेल्या प्रयत्नांदरम्यानच हा अपघात झाला होता.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलJammu Kashmirजम्मू-काश्मीर