शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

1987च्या आधी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार, केंद्रातल्या अधिकाऱ्याची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 10:11 IST

1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

नवी दिल्लीः 1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तसेच ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी भारतात जन्मलेले असल्यास त्यांना प्रामाणिक भारतीय नागरिक (Bona Fide Indian Citizens) मानलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019वरून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. तसेच देशात लागू होणाऱ्या नॅशनल रजिस्‍ट्रार ऑफ सिटिजन्स (NRC)बद्दलही नागरिकांनी घाबरून जाऊ नये.  नागरिकत्व कायद्या(Citizenship Act)मध्ये 2004ला संशोधन करण्यात आलं होतं. आसाम सोडल्यास इतर कोणत्याही राज्यात आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित (Illegal Immigrant) नसल्यास त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जातं. या कायद्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी देशात जन्मलेले आहेत, त्यांना भारतीय नागरिकच समजलं जाणार आहे. आसाममध्ये ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आसाम करार 1971 करण्यात आला होता.  एनआरसी-1 आणि एनआरसी-2मध्ये कोणाचा होणार समावेश26 जानेवारी 1950नंतर आणि 1 जुलै 1987च्या आधी जे भारतात जन्माला आलेले आहेत, त्यांचा एनआरसी-1 (NRC-1)मध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर 1 जुलै 1987 नंतर आणि 3 डिसेंबर 2004पूर्वी भारतात जन्माला आलेल्यांना एनआरसी-2मध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. ज्यात आई-वडिलांपैकी एकाला भारतीय असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. 3 डिसेंबर 2004ला किंवा त्यानंतर भारतात जन्माला आलेल्या आणि ज्यांच्या आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित (Illegal Immigrant)नसल्यास त्यांना भारतीय समजलं जाणार आहे.  3 डिसेंबर 2004नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या आई-वडिलांना हे करावं लागणार 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्यांना एका अटीवर भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. त्या मुलांच्या आई-वडिलांना दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नसल्याचं दाखवावं लागणार आहे. तसेच जन्माच्या वर्षभरातच भारतीय दूतावासात मुलाची जन्मनोंदणी केल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. अशात जन्म दाखला (Birth Certificate) किंवा म्‍युनिसिपल सर्टिफिकेट (Municipal Certificate) नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. 1971च्या आधी जन्मलेल्या भारतीय नागरिकाला जन्मदाखला किंवा वंश परंपरागत पुरावे दाखवण्याची गरज नसल्याचंही केंद्रातल्या गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक