शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

#MeToo: समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- अंतरा गांगुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:45 IST

समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले.

पुणे : मागील काही वर्षांत मुले व मुली असा समाजाकडून भेद करण्याच्या विचारांमध्ये बदल होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. पण हा बदल काही भागपुरताच दिसून येतो. अजूनही देशातील काही राज्यांमध्ये मुलींना सापत्न वागणूक मिळते. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. मुलींना संधी मिळाली तर त्या कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जाऊ शकतात, हे सातत्याने दिसून येते. म्हणून मुलींनाही मुलांप्रमाणेच सन्मान मिळण्याची गरज आहे. त्यासाठी समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची, विचार प्रगल्भ होण्याची गरज असल्याचे मत युनिसेफच्या जेंडर एक्स्पर्ट अंतरा गांगुली व यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी व्यक्त केले. लोकमत वुमन समीटमधील ‘शाश्वत जीवन जगण्यासाठीची गुरुकिल्ली’ या दुसऱ्या सत्रामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा व्यासपीठावर उपस्थित होते.भारतात भारतातील मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यामध्ये समान संधी दिली जात नाही. जैविकदृष्ट्या मुली मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात. पण भारतात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जगण्याचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. मात्र मागील काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. दहा वर्षांत बालविवाहाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले आहे. प्राथमिक स्तरावर अनेक भागात मुलींची शाळेतील उपस्थिती कमी असते. त्यामागे विविध कारणेही आहेत. गुजरातमध्ये एका गावात शाळा दूर असल्याने मुलींना जाता येत नव्हते. म्हणून मुलांनीच पुढाकार घेत मुली शाळेत गेल्या नाहीतस तर आम्हीही जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती, हे सकारात्मक चित्र आहे. मुलींप्रमाणेच मुलांवरही लैंगिक अत्याचार होतात. हे अत्याचार करणारे पुरुषच असतात. पण ‘मीटू’मध्ये काही पुरुषांनीही आपली कैफियत मांडली आहे. अनेक पुरुष याबाबत बोलत नाहीत. त्यासाठी समाजाने आपला दृष्टिकोन बदलायला हवा.- अंतरा गांगुलीबांधकाम क्षेत्र हे महिलांसाठी नाही, असे महिलांना वाटते. पण आत्मविश्वास असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात. माझे वडील बांधकाम क्षेत्रात असताना आजीने मलाही विरोध केला होता. लग्नानंतर पतीच्या व्यवसायातही सुरुवातीला अडचणी आल्या. पण हे तर आपले लहानपणापासूनचे स्वप्न असून त्याच्याकडे पाठ फिरवायची नाही, असे निश्चित करून पुन्हा काम सुरू केले. एक मालक म्हणून नव्हे, तर विद्यार्थी बनून कामात प्रगती करीत गेले. ‘गुड टच बॅड टच’ या मोहिमेअंतर्गत सुमारे इयत्ता आठवीच्या अडीच लाखांहून अधिक मुला-मुलींना याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. पुढील वर्षी हा आकडा सहा लाखांच्या पुढे जाईल. हे प्रशिक्षण देत असताना शेवटी काही मुली आपल्या झालेल्या अत्याचाराची माहिती देत होत्या. अनेक घटनांमध्ये कुटुंबातील व्यक्तीच अत्याचारी होते. पण त्यामध्ये घरातील लोकच अशा घटना पुढे येऊ देत नसल्याचे अनुभवही आले. अनेक प्रकरणांमध्ये तर खूप भयानक प्रसंग मुलींकडून सांगितले जातात.- उषा काकडेदेशामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. हे केवळ मुलींसोबत नाही तर मुलांसोबतही होते. तसेच लैंगिक अत्याचाराची समस्या माध्यमे, राजकारण यांसह सर्व क्षेत्रांमध्ये आहे. ही एक मानसिक विकृती आहे. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांना पुढे यायला हवे.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरिअल बोर्ड

टॅग्स :Metoo CampaignमीटूLokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८