शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

जीएसटीवरील काँग्रेससोबतची बैठक निष्फळ; जेटलींना नेहरूंचे स्मरण

By admin | Updated: December 15, 2015 03:21 IST

राज्यसभेत वारंवार होत असलेला कामकाजाचा खोळंबा आणि काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी दुपारी भोजन बैठक निष्फळ ठरल्यानंतर निराश झालेले अर्थमंत्री अरुण जेटली

-  हरीश गुप्ता, नवी दिल्ली

राज्यसभेत वारंवार होत असलेला कामकाजाचा खोळंबा आणि काँग्रेस नेत्यांसोबत सोमवारी दुपारी भोजन बैठक निष्फळ ठरल्यानंतर निराश झालेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वारशाचे स्मरण करवून देणारी भाषा चालविली आहे.जे पंडित नेहरूंच्या वारशावर हक्क सांगतात त्यांनी आपण स्वत: कोणता इतिहास घडवत आहोत असा प्रश्न स्वत:लाच करावा, असे सांगत जेटलींनी काँग्रेसच्या खासदारांना जनहिताच्या मुद्यांवर चर्चा करीत ऐतिहासिक जीएसटी घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी द्यावी, असे आवाहनही केले.राज्यसभेतील कामकाज ठप्प पडल्यामुळे सरकारवर हताश होण्याची पाळी आली आहे. अखेर जीएसटी विधेयकावर बैठकीत तोडगा काढण्याचे ठरले. संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या संसदीय चेम्बरमध्ये बैठक होऊनही कोंडी फुटू शकली नाही. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे बैठकीला आलेच नाहीत. येत्या काही दिवसांत पुन्हा बैठक घेण्यावर मात्र सहमती झाली आहे.जेटलींनी व्यक्त केली नाराजी काँग्रेसवर शरसंधान साधताना जेटली म्हणाले की, संसदेच्या गेल्या अधिवेशनात कामकाज झाले नाही. सध्याचे अधिवेशनही वाया जाण्याची शक्यता आहे. दरवेळी कारणे बदलत आहेत. हे आपल्यासाठी आणि देशासाठी चांगले आहे काय? हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची गरज आहे. पहिल्या लोकसभेच्या अखेरच्या दिवशी पंडित नेहरू यांनी २८ मार्च १९५७ रोजी दिलेल्या भाषणातील परिच्छेदही त्यांनी उद्धृत केला. सोमवारी जेटली आणि संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, उपनेते आनंद शर्मा यांच्याशी सल्लामसलत केली. जेटलींनी रविवारी काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत फोनवर चर्चा केली. सध्याच्या अधिवेशनात कामकाजाचे केवळ सहा दिवस उरले असताना काँग्रेसने सरकारच्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे. काँग्रेस भूमिकेवर ठाम...नायडूंच्या कार्यालयात तासभर चाललेल्या चर्चेत सकारात्मक असे काही निष्पन्न होऊ शकले नाही. सरकार आणि काँग्रेस आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने कोंडी फुटू शकली नाही. नॅशनल हेराल्डप्रकरणी संसदेचे कामकाज ठप्प झाले असताना आणि काँग्रेसने सरकारवर हल्ला चालविल्याच्या पार्श्वभूमीवर जीएसटीसंबंधी बैठक बोलावण्यात आली. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावल्यामुळे जीएसटीचा मार्ग रोखून धरल्याचा आरोप काँग्रेसने फेटाळला आहे.सरकारही ताठर... अटी फेटाळल्याहेराल्ड प्रकरणाचा संबंध जीएसटीशी जोडत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. अबकारी आणि विक्री करांसह सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर सुधारणा म्हणून जीएसटी विधेयकाकडे बघितले जाते. काँग्रेसने हे विधेयक पारित करण्यासाठी काही अटी समोर केल्या आहेत. त्या मान्य न करता सरकारने ताठरपणा कायम राखला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी अहवाल सादर केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या मतभेदांचे फार कमी मुद्दे उरले आहेत. हे विधेयक पारित होऊच द्यायचे नाही, असे काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी ठरविले तर काहीही होऊ शकणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.कोणते आहेत मतभेदांचे मुद्दे...- घटनात्मक सुधारणा विधेयक असल्यामुळे करांची कमाल मर्यादा घालून देता येणार नाही- जेटलींची स्पष्टोक्ती.- तामिळनाडूसारख्या उत्पादक राज्यांमधील अण्णाद्रमुक सरकारने वस्तूंवर लावलेला अतिरिक्त एक टक्का कर वगळण्यासाठी या सरकारशी चर्चा करावी लागणार.- वस्तूंवरील एक टक्का अतिरिक्त कर रद्द करावा. तसेच साध्या स्वरुपात जीएसटी कायदा लागू केला जावा अशी काँग्रेसची मागणी आहे.