शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

महिला संतप्त
या मोर्चात महिलांचा समावेश अधिक होता. या वसाहतीत सुमारे ६०० लोक राहतात. केवळ बोअरिंगवरूनच पाणी उपलब्ध आहे. नवीन बोअरिंगला तर पाणीही लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

नितीन साहित्यानगर हे गेल्या दोन-अडीच वर्षात विकसित झाले आहे. त्यामुळे तेथे मनपाची पाईपलाईन नाही. सुप्रीम कॉलनीत वाघूर जलवाहिनीवरून ६ इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ती पाईपलाईनही पुढे ३ इंची होत गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कॉलनीत देखील पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यापुढे नितीन साहित्यानगर असल्याने त्यांना या तीन इंची पाईपलाईनवरून पुढे पाईपलाईन जोडून दिली तरीही पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र नागरिकांच्या आग्रहावरून प्रायोगिक तत्वावर हे पाईपलाईन जोडून देण्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी मान्य केले.

जलकंुभाची गरज
सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.


अमृत योजनेत प्रस्ताव
मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.
---- इन्फो------
एमआयडीसी व मजिप्राला पत्र
पाणीपुरवठा विभागाने एमआयडीसीला पत्र पाठवून गितांजली केमिकल्सच्या पाईपलाईनवरून या नितीन साहित्या नगरातील नागरिकांसाठी तात्पुरती पाईपलाईन जोडून द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपाकडे ६ लाख रुपये घेणे असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. दरम्यान मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडेही पत्र देऊन सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींसाठी पाईपलाईनचा आराखडा तयार करून देण्याची मागणी केली आहे.