शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

महिला संतप्त
या मोर्चात महिलांचा समावेश अधिक होता. या वसाहतीत सुमारे ६०० लोक राहतात. केवळ बोअरिंगवरूनच पाणी उपलब्ध आहे. नवीन बोअरिंगला तर पाणीही लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

नितीन साहित्यानगर हे गेल्या दोन-अडीच वर्षात विकसित झाले आहे. त्यामुळे तेथे मनपाची पाईपलाईन नाही. सुप्रीम कॉलनीत वाघूर जलवाहिनीवरून ६ इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ती पाईपलाईनही पुढे ३ इंची होत गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कॉलनीत देखील पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यापुढे नितीन साहित्यानगर असल्याने त्यांना या तीन इंची पाईपलाईनवरून पुढे पाईपलाईन जोडून दिली तरीही पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र नागरिकांच्या आग्रहावरून प्रायोगिक तत्वावर हे पाईपलाईन जोडून देण्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी मान्य केले.

जलकंुभाची गरज
सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.


अमृत योजनेत प्रस्ताव
मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.
---- इन्फो------
एमआयडीसी व मजिप्राला पत्र
पाणीपुरवठा विभागाने एमआयडीसीला पत्र पाठवून गितांजली केमिकल्सच्या पाईपलाईनवरून या नितीन साहित्या नगरातील नागरिकांसाठी तात्पुरती पाईपलाईन जोडून द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपाकडे ६ लाख रुपये घेणे असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. दरम्यान मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडेही पत्र देऊन सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींसाठी पाईपलाईनचा आराखडा तयार करून देण्याची मागणी केली आहे.