शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

महिला संतप्त
या मोर्चात महिलांचा समावेश अधिक होता. या वसाहतीत सुमारे ६०० लोक राहतात. केवळ बोअरिंगवरूनच पाणी उपलब्ध आहे. नवीन बोअरिंगला तर पाणीही लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

नितीन साहित्यानगर हे गेल्या दोन-अडीच वर्षात विकसित झाले आहे. त्यामुळे तेथे मनपाची पाईपलाईन नाही. सुप्रीम कॉलनीत वाघूर जलवाहिनीवरून ६ इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ती पाईपलाईनही पुढे ३ इंची होत गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कॉलनीत देखील पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यापुढे नितीन साहित्यानगर असल्याने त्यांना या तीन इंची पाईपलाईनवरून पुढे पाईपलाईन जोडून दिली तरीही पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र नागरिकांच्या आग्रहावरून प्रायोगिक तत्वावर हे पाईपलाईन जोडून देण्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी मान्य केले.

जलकंुभाची गरज
सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.


अमृत योजनेत प्रस्ताव
मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.
---- इन्फो------
एमआयडीसी व मजिप्राला पत्र
पाणीपुरवठा विभागाने एमआयडीसीला पत्र पाठवून गितांजली केमिकल्सच्या पाईपलाईनवरून या नितीन साहित्या नगरातील नागरिकांसाठी तात्पुरती पाईपलाईन जोडून द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपाकडे ६ लाख रुपये घेणे असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. दरम्यान मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडेही पत्र देऊन सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींसाठी पाईपलाईनचा आराखडा तयार करून देण्याची मागणी केली आहे.