शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार

By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 20:03 IST

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली.

ठळक मुद्देकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलेआंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये ३ डिसेंबर रोजी होणार चर्चेची पुढची फेरी

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारसोबत ३ डिसेंबर रोजी चर्चेची पुढची फेरी होणार असल्याचे सांगितले.केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बरेच दिवस तिढा कायम राहिल्यानंतर आज शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार चर्चेसाठी समोरासमोर आले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमधील ही बैठक सुमारे चार तास चालली. मात्र त्यातून कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही. आता ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळातील सदस्य चंदा सिंह यांनी सांगितले की, कृषी कायद्याविरोधात आमचे आंदोलन सुरू राहील. आम्ही केंद्र सरकारकडून काही ना काही परत घेऊन जाणारच. मग ती गोळी असेल किंवा अन्य काही. आम्ही पुन्हा एकदा चर्चेसाठी जाणार आहोत.

तर बैठकीनंतर रुलदू सिंह मनसा यांनी सांगितले की, आम्ही मोठ्या समितीची मागणी करत आहोत. मात्र सरकार छोटी समिती बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीच काही निर्णय होऊ शकला नाही. आता पुन्हा तीन तारखेला बैठक होणार आहे. ऑल इंडिया किसान फेडरेशनचे अध्यक्ष, प्रेमसिंह भंगू यांनी सांगितले की, कृषिमंत्र्यांसोबतची आजची बैठक चांगली झाली. त्यात काही प्रमाणात प्रगतीही झाली. आता सरकारसोबत ३ डिसेंबर रोजी आमची पुढची बैठक होईल तेव्हा आम्ही सरकारवर दबाव बनवणार आहोत. तसेच कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यां हितासाठी कुठलीही तरतूद नसल्याचे सांगणार आहोत. सध्या आमचे आंदोलन सुरू राहील. 

आजच्या बैठकीबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेली बैठक चांगली राहिली. आता आम्ही तीन डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. आम्ही छोटी समिती बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकरी सर्वांसोबत चर्चा व्हावी यासाठी आग्रही आहेत. आम्हाला त्याबाबत काही अडचण नाही आहे. आम्ही शेतकऱ्यांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती