शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

यंत्रणेची कार्यशैली, यशापयश यांची सातत्याने चिकित्सा हवी , न्या. चेलमेश्वर यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:03 IST

न्या. चेलमेश्वर यांच्यासह चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या कार्यपद्धतीवर शरसंधान केल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर चेलमेश्वर आज पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहिले होते. तिथे ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

नवी दिल्ली : एखादी यंत्रणा कशी काम करते, तिचे तसेच त्यातील यश व अपयश या बाबींचे सातत्याने परीक्षण व चिकित्सा व्हायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्या. जस्ती चेलामेश्वर यांनी सोमवारी व्यक्त केले.न्या. चेलमेश्वर यांच्यासह चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी अलीकडेच पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या कार्यपद्धतीवर शरसंधान केल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर चेलमेश्वर आज पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक समारंभाला उपस्थित राहिले होते. तिथे ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.अमेरिकेतील केंटुकी विद्यापीठातील प्राध्यापक जॉर्ज गडबोइज यांनी लिहिलेल्या ‘सुप्रीम कोर्ट आॅफ इंडिया - द बिगिनिंग्ज' या पुस्तकाचे प्रकाशन न्या. चेलामेश्वर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी चेलमेश्वर म्हणाले की, न्याययंत्रणा निष्पक्ष व स्वतंत्र बाण्याची असेल तर लोकशाहीला कोणताही धोका निर्माण होत नाही. उदारमतवादी लोकशाहीचे अस्तित्व टिकून राहाण्यामध्ये निष्पक्ष न्याययंत्रणेचा मोलाचा वाटा असतो.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत या न्यायालयात जे कामकाज झाले त्याचा बारकाईने अभ्यास करुन प्राध्यापक जॉर्ज गडबोइज यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या दोन दशकांतील कामकाजाच्या बळावरच सर्वोच्च न्यायालयातील न्यायदानात काही उत्तम पायंडे निर्माण झाले. देशातील कार्यरत यंत्रणांमध्ये जनतेच्या हितासाठी सुधारणा व्हायला पाहिजेत, असे ज्यांना वाटते त्यांनी या यंत्रणांच्या कार्यशैलीचा व यशापयशाचा अभ्यास केला पाहिजे.आब टिकून राहावीसर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक खटले वर्षानुवर्षे निकालाविना तुंबून राहातात. या प्रश्नावर काही प्रभावी तोडगा काढणे आवश्यक आहे, तरच सर्वोच्च न्यायालयाची उपयोगिता व आब टिकून राहील, असेही चेलमेश्वर म्हणाले. या समारंभाला न्या. मदन लोकूर हेही उपस्थित होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय