शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
4
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
5
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
6
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
7
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
8
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
9
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
10
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
11
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
12
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
13
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
14
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
15
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
16
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
18
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
19
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
20
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदावर नाईक परिवाराचा वरचष्मा १२ वर्षे नाईकच महापौर : २० वर्षांत चार महिलांना संधी

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेवर स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. पक्ष कोणताही असो सत्ता नाईकांचीच असे समीकरण तयार झाले आहे. १९९२ मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली व १९९५ मध्ये पहिली निवडणूक झाली. निवडणुकीनंतर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांची महापौरपदी वर्णी लागली. सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली होती. तेव्हा महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. यानंतर सुषमा दंडे यांना शिवसेनेने महापौर बनविले. त्यांनी कामकाजावर स्वतंत्र ठसा उमटविला होता. यानंतर नारायण राणे समर्थक चंदू राणे यांना सेनेने महापौर बनविले. दरम्यान, गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व स्थानिक आघाडी तयार केली. या आघाडीच्या माध्यमातून विजया म्हात्रे व नंतर नाईक यांचे बंधू तुकाराम नाईक महापौर झाले. दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव झाले. पूर्ण पाच वर्षे संजीव नाईक यांनी महापौरपद भूषविले. याच काळात त्यांनी मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला व पालिकेचा पाणीप्रश्न पुढील ५० वर्षांसाठी संपविला. मोरबे धरणासाठी त्यांचा कार्यकाळ कायमस्वरूपी लक्षात राहील.
तिसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचा पालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला. राष्ट्रवादीने मालमत्ता व पाणी बिलात २० वर्षे वाढ न करण्याची घोषणा केली. यामुळे पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. परंतु महापौरपद राखीव झाल्यामुळे नाईक यांचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले. पहिल्या अडीच वर्षांत मनीषा भोईर व नंतर अंजनी भोईर यांना संधी देण्यात आली. पाच वर्षांच्या काळात दोन्ही महापौरांनी चांगले काम केले. याच काळात स्कूल व्हिजन, तलाव व्हिजन, उद्यान व्हिजनचा प्रश्न मार्गी लागला. ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण ही कामे मार्गी लागली. पालिका मुख्यालय, डॉ. आंबेडकर भवन, वंडर्स पार्क,रॉक गार्डन ही महत्त्वाची कामे याच काळात सुरू झाली. यामुळे पालिकेसाठी ही पाच वर्षे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक बिनविरोध निवडून आले व थेट महापौर बनले. त्यांच्या काळात पालिकेच्या क्रीडा विभागाचा कायापालट झाला. २२ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. महापौर मॅरेथॉनसह अनेक राज्यस्तरीय स्पर्धा सुरू झाल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली.

महापौर चौकट,नावाने दुसरी फाईल आहे