शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

महापौरपदावर नाईक परिवाराचा वरचष्मा १२ वर्षे नाईकच महापौर : २० वर्षांत चार महिलांना संधी

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेवर स्थापनेपासून माजी मंत्री गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. पक्ष कोणताही असो सत्ता नाईकांचीच असे समीकरण तयार झाले आहे. १९९२ मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली व १९९५ मध्ये पहिली निवडणूक झाली. निवडणुकीनंतर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांची महापौरपदी वर्णी लागली. सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली होती. तेव्हा महापौरपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. यानंतर सुषमा दंडे यांना शिवसेनेने महापौर बनविले. त्यांनी कामकाजावर स्वतंत्र ठसा उमटविला होता. यानंतर नारायण राणे समर्थक चंदू राणे यांना सेनेने महापौर बनविले. दरम्यान, गणेश नाईक यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व स्थानिक आघाडी तयार केली. या आघाडीच्या माध्यमातून विजया म्हात्रे व नंतर नाईक यांचे बंधू तुकाराम नाईक महापौर झाले. दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महापौरपद अडीच वर्षांसाठी राखीव झाले. पूर्ण पाच वर्षे संजीव नाईक यांनी महापौरपद भूषविले. याच काळात त्यांनी मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतला व पालिकेचा पाणीप्रश्न पुढील ५० वर्षांसाठी संपविला. मोरबे धरणासाठी त्यांचा कार्यकाळ कायमस्वरूपी लक्षात राहील.
तिसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचा पालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला. राष्ट्रवादीने मालमत्ता व पाणी बिलात २० वर्षे वाढ न करण्याची घोषणा केली. यामुळे पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. परंतु महापौरपद राखीव झाल्यामुळे नाईक यांचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले. पहिल्या अडीच वर्षांत मनीषा भोईर व नंतर अंजनी भोईर यांना संधी देण्यात आली. पाच वर्षांच्या काळात दोन्ही महापौरांनी चांगले काम केले. याच काळात स्कूल व्हिजन, तलाव व्हिजन, उद्यान व्हिजनचा प्रश्न मार्गी लागला. ठाणे - बेलापूर रोडचे काँक्रीटीकरण ही कामे मार्गी लागली. पालिका मुख्यालय, डॉ. आंबेडकर भवन, वंडर्स पार्क,रॉक गार्डन ही महत्त्वाची कामे याच काळात सुरू झाली. यामुळे पालिकेसाठी ही पाच वर्षे कायमस्वरूपी लक्षात राहणार आहेत. चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक बिनविरोध निवडून आले व थेट महापौर बनले. त्यांच्या काळात पालिकेच्या क्रीडा विभागाचा कायापालट झाला. २२ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. महापौर मॅरेथॉनसह अनेक राज्यस्तरीय स्पर्धा सुरू झाल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली.

महापौर चौकट,नावाने दुसरी फाईल आहे