शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 02:47 IST

मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

लखनौ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार यांच्यावर बिहार निवडणुकांच्या निमित्ताने बसपा नेत्या मायावती यांनी जोरदार शरसंधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना बिहारातील निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का, असा सवाल मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, बिहारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लाखो गरीब कुटुंबांची कोरोना महामारी आणि पुरामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. तथापि, त्यांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत सरकार पूर्णत: उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मदतीचा अभाव हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. संतप्त झालेले लोक आमदारांना ओलीस धरीत आहेत. परिस्थिती इतकी विकोपाला गेली असली तरीही सरकार उदासीन आणि बेजाबदारच आहे. ही बाब अत्यंत दु:खदायक आणि अमानवी आहे. बिहारात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. कोरोना महामारीची परिस्थितीही राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीकास्त्र सोडले आहे.सर्वच पातळ्यांवर सरकारची बेशिस्तअन्य एका टष्ट्वीटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, बिहार निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना जनतेच्या हिताबाबत तेथील सरकारकडून प्रत्येक पातळीवर बेशिस्तीचे आणि उदासीनतेचे प्रदर्शन केले जात आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. अशा वेळी एकच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो की, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांना वेळेवर घ्यायच्या नाहीत का?

टॅग्स :mayawatiमायावतीBiharबिहार