शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 02:47 IST

मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत

लखनौ : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार यांच्यावर बिहार निवडणुकांच्या निमित्ताने बसपा नेत्या मायावती यांनी जोरदार शरसंधान केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना बिहारातील निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का, असा सवाल मायावती यांनी केला आहे.मायावती यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, बिहारातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लाखो गरीब कुटुंबांची कोरोना महामारी आणि पुरामुळे पूर्ण वाताहत झाली आहे. लोक मेटाकुटीला आले आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. तथापि, त्यांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत सरकार पूर्णत: उदासीन असल्याचे दिसून येत आहे.मदतीचा अभाव हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. संतप्त झालेले लोक आमदारांना ओलीस धरीत आहेत. परिस्थिती इतकी विकोपाला गेली असली तरीही सरकार उदासीन आणि बेजाबदारच आहे. ही बाब अत्यंत दु:खदायक आणि अमानवी आहे. बिहारात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. कोरोना महामारीची परिस्थितीही राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीकास्त्र सोडले आहे.सर्वच पातळ्यांवर सरकारची बेशिस्तअन्य एका टष्ट्वीटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, बिहार निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या असताना जनतेच्या हिताबाबत तेथील सरकारकडून प्रत्येक पातळीवर बेशिस्तीचे आणि उदासीनतेचे प्रदर्शन केले जात आहे. ही बाब आश्चर्यकारक आहे. अशा वेळी एकच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो की, विधानसभेच्या निवडणुका केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांना वेळेवर घ्यायच्या नाहीत का?

टॅग्स :mayawatiमायावतीBiharबिहार