शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपापासून मायावती बसपाला दूर ठेवतील?

By admin | Updated: February 18, 2017 01:42 IST

बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय

सुरेश भटेवरा / लखनऊ (उत्तर प्रदेश)बहुमत न मिळाल्यास बहुजन समाज पक्ष विरोधी बाकांवर बसेल, मात्र भाजपाबरोबर सरकार बनवणार नाही. खचलेल्या भाजपाने मुस्लीम समुदाय बसपापासून दूर राहावा, यासाठी सोशल मीडियाद्वारे खोटा प्रचार चालवला आहे. या अफवांवर अल्पसंख्य समाजाने विश्वास ठेवू नये... हे वक्तव्य आहे मायावतींचे.मैदानावर हजारो समर्थकांची गर्दी होती. सभेसाठी लोक चालत आले होते. एका दिव्यांगाची गर्दीशी झटापट चालली होती. सभा संपताच त्याला विचारले, बहनजींच्या सभेबाबत कशाची उत्सुकता वाटते? तेव्हा तो म्हणाला, ‘मेरे जैसे लाखो लोगोंका नसीब बदलने की क्षमता बहनजी में हैं।’ सभा संपल्यावर लोक शांततेत परतले. त्यांच्या चेहऱ्यांवर विद्रोहाची झलक होती. पंधरा-वीस वर्षांपूर्वी बसपचा निळा झेंडा शहरी झोपडपट्ट्या व ग्रामीण भागातल्या कच्च्या घरांवर दिसायचा. आता पक्क्या घरांवर, खिडक्यांंवर, मुस्लीम मोहल्ल्यांमध्येही तो दिसतो. मोठमोठे होर्डिंग्ज, चमकदार प्रचारसाहित्य आणि मीडियाच्या झगमगाटापासून दूर, बसपचे कार्यकर्ते गल्लोगल्ली बहनजींसाठी मतांचा जोगवा मागतात. अगदी मीडियाच्या सहकार्याविना.ब्राह्मण समाजाने गेल्या निवडणुकीत मायावतींची साथ सोडली. पण बसपामधे जाटवांचे वर्चस्व असल्याने कश्यप, पासी, मौर्य, धोबी, वाल्मिकी नेत्यांना महत्त्व न मिळाल्याने गैरजाटव नेतेही बसपापासून दूर गेले. भाजपाने हे हेरले आणि परंपरागत मतदारांसह दलित व ओबीसींचीही मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तो कितपत यशस्वी ठरतो, हे निकालानंतर कळेल. समाजवादी पक्षातला कलह शिगेला पोहोचल्यामुळे मुस्लीम समाज संभ्रमात होता. तेव्हा मुस्लीम-दलितांचे समीकरण साधून, मायावती सत्ता मिळवतील, असे बोलले जायचे. पण सपा व काँग्रेसला परिस्थितीने एकत्र आणल्याने सारे चित्रच बदलले. पश्चिमी उत्तर प्रदेशात मायावतींना गेल्या वेळी २४ जागा मिळाल्या. यंदा त्यात वाढ होईल, असा प्रचार भाजपाने केला. सपा व बसपामध्ये मुस्लिम मतदारांचे विभाजन व्हावे, असा तयामागील हेतू. भाजपाचा हा खेळ यशस्वी झाल्यास कोणालाच बहुमत नाही, अशी स्थिती होऊ शकते. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल. पण बसपाला भाजपपासून दूर ठेवण्याचा दिलेला शब्द मायावती अखेरपर्यंत पाळतील काय? इतकाच प्रश्न शिल्लक आहे.