शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 11:29 IST

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल

लखनऊ - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते काश्मीर दौऱ्यावर गेले होते. त्यावर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी जोरदार टीका केली आहे. कोणताही विचार न करता काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं मायावती यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते यांनी काश्मीर दौऱ्यावर जाण्याचा चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे केंद्र आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्याची संधी मिळाली असल्याचा आरोप मायावती यांनी केला. 

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल. मायावती यांनी ट्विट करत बसपाने संसदेत कलम 370 हटविण्याला समर्थन दिलं होतं हे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्या देशातील समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले होते. त्यामुळे ते जम्मू काश्मीर राज्याला कलम 370 लागू करण्याच्या समर्थनार्थ नव्हते. त्याचसाठी बसपाने संसदेत कलम 370 हटविण्याचं समर्थन केलं. 

कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य व्हायला वेळ लागणार आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतर 70 वर्षाने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी वाट पाहणे योग्य राहील. कोर्टानेही काश्मीर मुद्द्यावर सरकारला वेळ द्यावा अस सांगितलं आहे. त्यामुळे यावर राजकारण करणे योग्य राहणार नाही असं मायावती यांनी सांगितले. 

काश्मीरमधील परिस्थिती पाहता अशावेळी काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या नेत्यांकडून काश्मीरमध्ये जाणे म्हणजे केंद्र आणि जम्मू काश्मीरमधील राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राजकारण करण्यासाठी संधी देणे असा निर्णय नाही का? त्याठिकाणी जाण्यापूर्वी थोडा विचार केला असता तर योग्य राहिलं असतं असा टोला मायावती यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना लगावला आहे. 

शनिवारी राहुल गांधी श्रीनगर विमानतळावर पोहोचले. राहुल यांच्यासोबत विरोधी पक्षातील 8 घटक पक्षांचे एकूण 11 नेते सोबत होते. जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील कलम 370 हटविल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले होते. जम्मू काश्मीरमध्ये जाऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नेत्यांसह, सामान्य नागरिकांची राहुल गांधी भेट होते. मात्र, राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुन आतमध्ये सोडण्यात आले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमातळावरच अडकून पडावे लागले होते. त्यानंतर काही काळ गोंधळ उडाला. अखेर श्रीनगर विमानतळावरुन त्यांना दिल्लीला परत फिरावे लागले होते.  

टॅग्स :mayawatiमायावतीRahul Gandhiराहुल गांधीJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370