शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

'अल्लाह आणि ओम एकच...' अर्शद मदनीच्या वक्तव्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मोठा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:23 IST

'इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही, येथील मूळ धर्म सनातन आहे. मौलाना मदनी फतव्याचा कारखाना.'- सुफी इस्लामिक बोर्ड

नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात मंचावर मोठा गोंधळ झाला. मौलाना अर्शद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका करताना अल्लाह आणि ओम एकच असल्याचे म्हटले. यानंतर जैन गुरु लोकेश मुनी यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर जैन आणि इतर अनेक धर्मगुरुंनी मंच सोडला.

जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले. 'अल्लाह आणि ओम एकच आहेत. आम्ही या देशात पहिल्यांदा जन्मलो आणि म्हणूनच भागवतांचे सर्व मुस्लिम हिंदू आहेत, हे विधान अतिशय चुकीचे आहे,' असे मदनी म्हणाले. यानंतर जैन गुरू लोकेश मुनी यांनी मंचावर उभे राहून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही : मदनीयापूर्वी महमूद मदनी म्हणाले होते की, भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही, पण धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. RSS संस्थापकाच्या Bunch of Thoughts या पुस्तकात अनेक समस्या आहेत, पण सध्याच्या RSS प्रमुखांच्या अलीकडच्या विधानांकडेही दुर्लक्ष करता कामा नये. मतभेद संपवण्यासाठी आम्ही संघ प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. पण, मुस्लिमांना पैगंबरांचा अपमान मान्य नाही. शिक्षणाचे भगवेकरण होत आहे. कोणत्याही धर्माची पुस्तके इतरांवर लादू नयेत, असेही ते म्हणाले. 

'भारताचा मूळ धर्म सनातन, मौलाना मदनी फतव्याचा कारखाना'

सुफी इस्लामिक बोर्डाने जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी मदानी यांच्या विधानाला विरोध करताना म्हटले की, इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही. येथील मूळ धर्म सनातन आहे. महमूद मदनी बद्दल सांगायचे, तर तो फतव्याचा कारखाना आहे. इस्लाम पहिल्या येणाऱ्या मुस्लिमांनी आणला. हजरत मतलतुल औलिया, मकरबूर शरीफ आले, त्यानंतर अरबस्तानातील कासिम बिन मलिक भारतात केरळमध्ये आले. त्यानंतर रसूल करीम सल्लल्लाह अला पाकचे ख्वाजा गरीब नवाज आले. ज्यांनी इथे येऊन इस्लामचा प्रसार केला. त्यांच्या चारित्र्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे येथे इस्लामचा प्रसार झाला. आज देशातील सरकार कोणत्याही मुस्लिमाला बाहेरचा माणूस मानत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदूNew Delhiनवी दिल्ली