शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

'अल्लाह आणि ओम एकच...' अर्शद मदनीच्या वक्तव्यानंतर जमियत उलेमा-ए-हिंदच्या मंचावर मोठा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:23 IST

'इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही, येथील मूळ धर्म सनातन आहे. मौलाना मदनी फतव्याचा कारखाना.'- सुफी इस्लामिक बोर्ड

नवी दिल्ली: दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात मंचावर मोठा गोंधळ झाला. मौलाना अर्शद मदनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका करताना अल्लाह आणि ओम एकच असल्याचे म्हटले. यानंतर जैन गुरु लोकेश मुनी यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर जैन आणि इतर अनेक धर्मगुरुंनी मंच सोडला.

जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले. 'अल्लाह आणि ओम एकच आहेत. आम्ही या देशात पहिल्यांदा जन्मलो आणि म्हणूनच भागवतांचे सर्व मुस्लिम हिंदू आहेत, हे विधान अतिशय चुकीचे आहे,' असे मदनी म्हणाले. यानंतर जैन गुरू लोकेश मुनी यांनी मंचावर उभे राहून या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही : मदनीयापूर्वी महमूद मदनी म्हणाले होते की, भाजप आणि आरएसएसशी शत्रुत्व नाही, पण धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. RSS संस्थापकाच्या Bunch of Thoughts या पुस्तकात अनेक समस्या आहेत, पण सध्याच्या RSS प्रमुखांच्या अलीकडच्या विधानांकडेही दुर्लक्ष करता कामा नये. मतभेद संपवण्यासाठी आम्ही संघ प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. पण, मुस्लिमांना पैगंबरांचा अपमान मान्य नाही. शिक्षणाचे भगवेकरण होत आहे. कोणत्याही धर्माची पुस्तके इतरांवर लादू नयेत, असेही ते म्हणाले. 

'भारताचा मूळ धर्म सनातन, मौलाना मदनी फतव्याचा कारखाना'

सुफी इस्लामिक बोर्डाने जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला आहे. बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते कशिश वारसी यांनी मदानी यांच्या विधानाला विरोध करताना म्हटले की, इस्लाम हा भारताचा मूळ धर्म नाही. येथील मूळ धर्म सनातन आहे. महमूद मदनी बद्दल सांगायचे, तर तो फतव्याचा कारखाना आहे. इस्लाम पहिल्या येणाऱ्या मुस्लिमांनी आणला. हजरत मतलतुल औलिया, मकरबूर शरीफ आले, त्यानंतर अरबस्तानातील कासिम बिन मलिक भारतात केरळमध्ये आले. त्यानंतर रसूल करीम सल्लल्लाह अला पाकचे ख्वाजा गरीब नवाज आले. ज्यांनी इथे येऊन इस्लामचा प्रसार केला. त्यांच्या चारित्र्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे येथे इस्लामचा प्रसार झाला. आज देशातील सरकार कोणत्याही मुस्लिमाला बाहेरचा माणूस मानत नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Muslimमुस्लीमHinduहिंदूNew Delhiनवी दिल्ली