शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान

By बाळकृष्ण परब | Updated: January 25, 2021 23:03 IST

India china faceoff : भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या कर्नल संतोष बाबूंसह २० जणांना वीरमरण आले होते. मात्र धारातीर्थी पडण्यापूर्वी या वीर जवानांनी चीनचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. दरम्यान, भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र, तर इतर पाच जवानांना वीरता पदक जाहीर करण्यात आले आहे.कर्नल संतोष बाबूंना त्यांच्या शौर्यासाठी मरणोपरांत महावीर चक्र जाहीर झाले आहे. तर नायब सुभेदार नुडूराम सोरेन, हवालदार के. पिलानी, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना वीरता पदक जाहीर झाले आहे. तर हुतात्मा मेजर अनुज सूद यांना काश्मीर खोऱ्यातील उत्कृष्ट कामासाठी शौर्य चक्र जाहीर झाले आहे.लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती असताना चिनी सैन्याकडून घुसखोरी हाणून पाडण्याच्या मोहिमेवर कर्न संतोष बाबू आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी निघाले होते. त्यावेळी गलवान खोऱ्यात तुंबळ चकमक होऊन भारताचे २० जवान धारातीर्थी पडले होते. तर भारतीय जवानांनी चीनच्या ४० हून अधिक सैनिकांना ठार केले होते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndian Armyभारतीय जवान