शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:45 IST

राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत.

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर अठराव्या दिवशी गुरुवारी काश्मीरच्या बहुतेक भागांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर लोकांची थोडीफार वर्दळ व वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, काश्मीरमधील सर्व बाजारपेठा बंद आहेत. मोबाईल व इंटरनेटवरील बंधने मात्र दूर करण्यात आलेली नाहीत.यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरमधील परिस्थिती शांत असून बुधवारी कोणताही हिंसक प्रकार घडला नाही. श्रीनगर व काश्मीरमधील अन्य जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर लोकांची थोडीफार वर्दळ, वाहनांची ये-जा होताना दिसत होती. सार्वजनिक वाहतुकीची वाहने अद्यापही बंदच आहेत. काही प्रमाणात टॅक्सी व आॅटोरिक्षाची सेवा मात्र सुरू झाली आहे.शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीही यथातथाच आहे. मात्र, शाळेत अजून विद्यार्थी फिरकलेले नाहीत. राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत. ५ आॅगस्टपासून काश्मीरमधील बहुसंख्य बाजारपेठा बंदच आहेत.दरम्यान काश्मीरमधील लष्कर तसेच सशस्त्र सुरक्षा दलांना तूर्त हटवण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सशस्त्र दलाचे जवान तिथेच राहतील. (वृत्तसंस्था)दिल्लीत निदर्शनेनवी दिल्ली : काश्मीरमध्ये अटक केलेल्या नेत्यांची सुटका करावी या मागणीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यासह विरोधी पक्षांनी जंतरमंतर येथे गुरुवारी धरणे धरले होते. त्यामध्ये पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती हेही सहभागी झाले.या धरण्यात सामील झालेल्यांमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, राजदचे मनोज झा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी आदी नेते होते. जनता व लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेतल्याशिवाय ३७० कलम रद्द करणे ही लादलेली अप्रत्यक्ष आणीबाणीच आहे, असा ठराव या धरण्याच्या वेळी विरोधी पक्षांनी संमत केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर