शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

काश्मीरमध्ये बाजारपेठा बंदच; रस्त्यांवर वाहनांची वर्दळ, लोकही पडले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:45 IST

राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत.

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर अठराव्या दिवशी गुरुवारी काश्मीरच्या बहुतेक भागांमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर लोकांची थोडीफार वर्दळ व वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, काश्मीरमधील सर्व बाजारपेठा बंद आहेत. मोबाईल व इंटरनेटवरील बंधने मात्र दूर करण्यात आलेली नाहीत.यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरमधील परिस्थिती शांत असून बुधवारी कोणताही हिंसक प्रकार घडला नाही. श्रीनगर व काश्मीरमधील अन्य जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर लोकांची थोडीफार वर्दळ, वाहनांची ये-जा होताना दिसत होती. सार्वजनिक वाहतुकीची वाहने अद्यापही बंदच आहेत. काही प्रमाणात टॅक्सी व आॅटोरिक्षाची सेवा मात्र सुरू झाली आहे.शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थितीही यथातथाच आहे. मात्र, शाळेत अजून विद्यार्थी फिरकलेले नाहीत. राज्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासून व माध्यमिक शाळा बुधवारपासून पुन्हा सुरू झाल्या. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी असलेले बॅरिकेडस् काढून टाकण्यात आले आहेत. मात्र, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सुरक्षा दले सतर्क आहेत. ५ आॅगस्टपासून काश्मीरमधील बहुसंख्य बाजारपेठा बंदच आहेत.दरम्यान काश्मीरमधील लष्कर तसेच सशस्त्र सुरक्षा दलांना तूर्त हटवण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत सशस्त्र दलाचे जवान तिथेच राहतील. (वृत्तसंस्था)दिल्लीत निदर्शनेनवी दिल्ली : काश्मीरमध्ये अटक केलेल्या नेत्यांची सुटका करावी या मागणीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यासह विरोधी पक्षांनी जंतरमंतर येथे गुरुवारी धरणे धरले होते. त्यामध्ये पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती हेही सहभागी झाले.या धरण्यात सामील झालेल्यांमध्ये काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस डी. राजा, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, राजदचे मनोज झा, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी आदी नेते होते. जनता व लोकप्रतिनिधींचे मत जाणून घेतल्याशिवाय ३७० कलम रद्द करणे ही लादलेली अप्रत्यक्ष आणीबाणीच आहे, असा ठराव या धरण्याच्या वेळी विरोधी पक्षांनी संमत केला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर