शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

‘इंडिया’चा संसद ते विजय चौकापर्यंत मोर्चा; सरकारने लोकशाही पद्धतीने वागावे : खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:12 IST

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी गुरुवारी संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. पंतप्रधानांनी सुरक्षा भंगावर न बोलून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला.

‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधक खासदार निलंबित’, ‘संसद पिंजऱ्यात’, ‘लोकशाही हद्दपार’ असे लिहिलेले मोठे बॅनर आणि फलक हातात घेऊन खासदारांनी मोर्चा काढला. विजय चौक येथे खरगे म्हणाले की, लोकशाहीत बोलणे हा विरोधकांचा अधिकार असून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या भावना संसदेत पोहोचवणे, ही खासदारांची जबाबदारी आहे. संसद ही मोठी पंचायत आहे. कोणी संसदेत बोलायचे नसेल तर मग कोठे बोलायचे?विरोधी पक्षाचे खासदार सभापती धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावर बोलू देण्याची विनंती वारंवार करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्य कामकाजात अडथळा आणत आहेत. यावरून भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेस प्रमुखांनी केला. खरगे यांनी सरकारला लोकशाही पद्धतीने वागण्याचे आवाहनही केले.

मूळ मुद्यावरून भरकटवणे हेच कामजातनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर गप्प राहिल्यानंतर आता सरकार शेतकरी व जातीबद्दल बोलत आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. मोडतोड करणे, मूळ मुद्यांवरून भरकटवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद