शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

श्रीलंकेप्रमाणेच भारतातील अनेक राज्यं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 13:24 IST

लोकानुनयी घोषणा, मोफतच्या योजनांमुळे देशातील अनेक राज्यांच्या तिजोरीत खडखडाट

नवी दिल्ली: निवडणुका आल्यावर राजकीय पक्ष मोठमोठ्या घोषणा करतात. मतं मिळवण्यासाठी आश्वासनं दिली जातात. मोफत वीज, पाणी, कर्जमाफी यासारख्या घोषणांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. राज्य कर्जाच्या विळख्यात सापडतात. कर्जाच्या बोज्यामुळे भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. श्रीलंकेसारखीच स्थिती भारतात निर्माण होऊ शकते, अशी भीती आयएएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी भविष्यातला धोका सांगितला.

नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी एका राज्यात करण्यात आलेल्या लोकानुनयी योजनांचा उल्लेख सचिवांनी केला. संबंधित राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये लोकानुनयी योजना राबवल्यास आर्थिक स्थिती बिघडेल आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती सचिवांनी व्यक्त केली.

राज्यांमध्ये अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातल्या अनेक योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत. अशा योजनांमुळे आपण श्रीलंकेच्या दिशेनं जाऊ, असा धोक्याचा इशारा सचिवांनी दिला. यापैकी बहुतांश सचिवांनी केंद्रासाठी काम करण्यापूर्वी राज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. 

देशातील काही राज्यांची आर्थिक स्थिती तोळामासा झाली आहे. ही राज्यं भारताचा भाग नसती, तर आतापर्यंत ती दिवाळखोर झाली असती, असं सचिवांनी सांगितलं. पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातील सरकारांनी लोकानुनयी घोषणा केल्या आहेत. या योजना फार काळ चालवता येणार नाहीत. त्यामुळे तोडगा काढण्याची गरज आहे.

अनेक राज्यांमध्ये मोफत वीज दिली जात आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत आहे. आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांना यामुळे पुरेसा निधी मिळत नाही. भाजपनंही नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासोबतच अनेक लोकानुनयी घोषणा केल्या होत्या.