शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मनूचा मनुस्मृतीशी अर्थाअर्थी संबंध नाही, संस्कार भारतीचा दावा

By admin | Updated: May 10, 2017 20:54 IST

मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले,

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 10 - ‘मनुस्मृती’च्या निमित्ताने मनुवर टीकेची झोड उठवणाऱ्या भारतातल्या विविध राजकीय पक्षांनी ज्याप्रकारे आजवर मनुला अकारण बदनाम केले, तो एकतर्फी प्रयोग रा.स्व.संघाच्या संस्कार भारतीला मान्य नाही. अर्धवट माहिती व अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे मनुवर ही टीका होत असल्याचा दावा करीत, संस्कार भारतीने मनुच्या उजळ बाजूचे सत्य प्रकाशात आणण्याचा तसेच मनुच्या व्यक्तिमत्वाचे मेकओव्हर करून जनतेचे या संदर्भातले सारे भ्रम दूर करण्याचा निर्धार केला आहे. मनुस्मृती व वेदांमधील काही संकल्पनांंबाबतचा अपप्रचार दूर करण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयानेही तज्ज्ञ इतिहासकारांमार्फत संशोधन करावे व सत्य जगासमोर आणावे, असा आग्रह संस्कार भारतीचे सह संघटनमंत्री अमीरचंद यांनी केला आहे. मनुस्मृतीचा कालखंड आजपासून 1800 ते 2400 वर्षे जुना आहे तर मनुचा जन्म 8000 वर्षांपूर्वी झाल्याचे बहुतांश इतिहासतज्ज्ञ मानतात, असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, मनुच्या जन्मानंतर तब्बल 5 हजार वर्षांनी अस्तित्वात आलेल्या मनुस्मृतीवरील टीकेचे खापर मनुवर फोडणे सर्वथा अयोग्य व अन्यायकारक आहे. त्याचबरोबर अमीरचंद हे देखील मान्य करतात की मनुस्मृतीत अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. व्यापक समाजहित लक्षात घेता तो योग्य नाही. आगामी पिढ्यांपर्यंत फक्त चांगल्या गोष्टीच पोहोचाव्यात यासाठी मनुस्मृतीतल्या वादग्रस्त गोष्टी दुरुस्ती घडवून बाद केल्या पाहिजेत.मनुच्या इतिहासकालीन व्यक्तिमत्वाबरोबरच वेदांमधील काही संकल्पनांबाबतही जनतेत भ्रम निर्माण करण्याचा उद्योग काही लोकांमार्फत केला जातो. असे नमूद करीत अमीरचंद म्हणतात, भारतीय संस्कृतीच्या मूलतत्वांकडे आजवर जे दुर्लक्ष झाले त्यात सुधारणा घडवण्याचे व हा भ्रम दूर करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरचे चर्चासंवाद, इतिहासकालीन विषयांवर कार्यशाळा, व व्यापक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, संस्कार भारतीतर्फे ही मागणीही केंद्र सरकारकडे केली जाईल.