शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मोदींनी जगण्याचा अधिकार गमावला - काटजू

By admin | Updated: May 20, 2015 10:34 IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांनीही जगण्याचा अधिकार गमावला आहे असे सांगत मार्कंडेय काटजूंनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी संचालक यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे दोघे भामटे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नरसंहारक आहेत. या तिघांनाही जगण्याचा अधिकार नाही', असे काटजू यांनी म्हटले आहे. फेसबूक आणि ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून काटजू यांनी ही टिपण्णी केली आहे. 'घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे ठग आहेत, तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवणारे मोदीही  धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या कर्मांमुळे त्यांनी जगण्याचा अधिकार गमावला आहे', असे काटजूंनी त्यांच्या पोस्ट्समध्ये म्हटले आहे. 
त्यांच्या या वक्तव्याबाबत नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तरीही काटजू आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.