शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

मणिपूर हिंसाचार: केंद्रीय राज्यमंत्र्याचेही घर जाळले! मोठ्या प्रमाणात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 09:41 IST

५० जणांनी पेट्रोल बॉम्ब फेकले

इंफाळ: मणिपूरमध्ये ३ मेपासून आरक्षणावरून कुकी आणि मेतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचाराची आग वाढतच चालली आहे. येथे आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा हिंसाचार उसळला. १० लोकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या इंफाळ येथील घराची तोडफोड करून ते पेटवून दिले.

सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी रात्री आग लावण्याचा जमावाचा प्रयत्न हाणून पाडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेच्या वेळी केरळ दौऱ्यावर असलेले सिंह तेथील कार्यक्रम रद्द करून मणिपूरकडे निघाले आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी बुधवारी हत्या करणाऱ्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, मणिपूर हिंसाचारावर चर्चेसाठी संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

...या नेत्यांना केले आतापर्यंत लक्ष्य!

गेल्या २० दिवसांत मणिपूरमधील मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ल्याची ही चौथी घटना आहे. याआधी १४ जूनला इंफाळच्या लामफेल भागात उद्योगमंत्री नेमचा किपजेन यांच्या अधिकृत बंगल्याला आग लावण्यात आली होती. त्यावेळी किपगेन घरी नव्हते. ८ जून रोजी भाजप आमदार सोरासम केबी यांच्या घरावर आयईडी हल्ला झाला होता. २८ मे रोजी काँग्रेस आमदार रणजित सिंह यांच्या घरावरही हल्ला झाला होता.

आतापर्यंत काय झाले?

  • ३ मे पासून  हिंसाचार सुरू
  • १००+ जणांचा मृत्यू 
  • ४००+ जखमी
  • ८० हजारपेक्षा अधिक लोकांनी घर सोडले
  • २० दिवसांमध्ये चार मंत्री आणि आमदारांच्या घरांवर हल्ले

जवानांना ताजे जेवण मिळेना

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या सात बटालियनला गेल्या १८ दिवसांपासून ताजे जेवण मिळाले नाही. आसाम रायफल्स कुकी समुदायाची बाजू घेत असल्याचा आरोप करत मेतेई समुदायाने ताजे रेशन मिळण्याचे सर्व रस्ते ब्लॉक केले आहेत.

भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाने मणिपूरला ४० दिवसांहून अधिक काळ हिंसाचाराच्या आगीत जळत ठेवले आहे, ज्यात शंभरहून अधिक लोक मारले गेले. पंतप्रधान पूर्णपणे गप्प आहेत. हिंसाचार संपवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यात पाठवावे. हा द्वेषाचा बाजार बंद करूया आणि मणिपूरमधील प्रत्येक हृदयात प्रेमाचे दुकान उघडूया. -राहुल गांधी, काँग्रेस नेते

रात्री १० च्या सुमारास ५० हून अधिक लोकांनी माझ्या घरावर हल्ला केल्याचे मला सांगण्यात आले. हिंसाचाराच्या घटनांमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. -राजकुमार रंजन सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री

म्यानमारमधून ३०० सशस्त्र लोकांची घुसखोरी

३०० सशस्त्र लोक म्यानमारमधून राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे. तोरबुंगच्या जंगलात तळ बनवल्यानंतर हा हिंसाचार करणारा गट चुरचंदपूरकडे वळला आहे. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा ड्रोनचा वापर करत आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार