शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:35 IST

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे.

इंफाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये काही महिने शांतता होती. आता परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. अशा परिस्थितीत येथील बंडखोर गटांकडून काही कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे आसाम रायफल्सची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आसाम रायफल्सने म्हटले आहे की, अशा ट्रकचा वापर बंडखोर गट करत आहेत, ज्यावर निमलष्करी दलाचे चिन्ह आहे. आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. या ट्रकमध्ये निमलष्करी दलाच्या ट्रकप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

या ट्रकमध्ये बदल करून आसाम रायफल्सची प्रतिमा डागाळण्याचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, त्याचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये होऊ शकतो. आसाम रायफल्सने चुराचंदपूर पोलिसांना ककचिंग जिल्ह्यातील एसपी आणि उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर सुमारे १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान