शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:35 IST

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे.

इंफाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये काही महिने शांतता होती. आता परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. अशा परिस्थितीत येथील बंडखोर गटांकडून काही कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे आसाम रायफल्सची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आसाम रायफल्सने म्हटले आहे की, अशा ट्रकचा वापर बंडखोर गट करत आहेत, ज्यावर निमलष्करी दलाचे चिन्ह आहे. आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. या ट्रकमध्ये निमलष्करी दलाच्या ट्रकप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

या ट्रकमध्ये बदल करून आसाम रायफल्सची प्रतिमा डागाळण्याचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, त्याचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये होऊ शकतो. आसाम रायफल्सने चुराचंदपूर पोलिसांना ककचिंग जिल्ह्यातील एसपी आणि उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर सुमारे १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान