शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
2
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
3
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
4
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
5
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
6
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
7
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
8
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
9
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
10
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
11
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
12
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
13
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
14
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
15
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
16
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
17
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
18
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
19
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
20
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये बंडखोरांनी तयार केले लष्करासारखे ट्रक, आसाम रायफल्सने पोलिसांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:35 IST

आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे.

इंफाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार उसळला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये काही महिने शांतता होती. आता परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. अशा परिस्थितीत येथील बंडखोर गटांकडून काही कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे आसाम रायफल्सची चिंता वाढली आहे. 

दरम्यान, आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आसाम रायफल्सने म्हटले आहे की, अशा ट्रकचा वापर बंडखोर गट करत आहेत, ज्यावर निमलष्करी दलाचे चिन्ह आहे. आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांना पत्र लिहून काकचिंग जिल्ह्यात असे अनेक ट्रक वापरले जात असल्याचे म्हटले आहे. या ट्रकमध्ये निमलष्करी दलाच्या ट्रकप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

या ट्रकमध्ये बदल करून आसाम रायफल्सची प्रतिमा डागाळण्याचा उद्देश असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच, त्याचा वापर देशविरोधी कारवायांमध्ये होऊ शकतो. आसाम रायफल्सने चुराचंदपूर पोलिसांना ककचिंग जिल्ह्यातील एसपी आणि उच्च अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. 

मणिपूरमध्ये ३ मे रोजी जातीय हिंसाचार उसळला होता. मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये हा जातीय हिंसाचार झाला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती. या हिंसाचारानंतर सुमारे १७५ लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या हिंसाचारात शेकडो लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारIndian Armyभारतीय जवान