शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:17 IST

२१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला

इंफाल – मणिपूरच्या घटनेने इतकं दु:ख झालंय ते शब्दात सांगता येत नाही. कारगिलमध्ये देशाच्या रक्षणासाठी लढलो पण आता निवृत्त झाल्यानंतर पत्नीचं रक्षण करता आले नाही. एका महिलेचे कपडे उतरवून जमावाने जे कृत्य केले त्याचा विचारही केला नव्हता अशा शब्दात माजी सैनिकाने त्यांच्यावर घडलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे. मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मणिपूरच्या घटनेत एकूण ३ महिलांपैकी २ महिलांना नग्न करून रस्त्यावरून फिरवले. FIR मध्ये असा उल्लेख आहे की, तिसऱ्या महिलेला कपडे काढण्यास मजबूर केले परंतु व्हिडिओत ती दिसली नाही. भारतीय सैन्यात सुभेदार पदावरून निवृत्त झालेले महिलेचे पती ज्यांनी कारगिल युद्धही लढले आहे. मणिपूरच्या हिंसाचारात त्यांचे घर, संपत्ती आणि आता इज्जतही गेली आहे. मी युद्ध पाहिले आहे. कारगिलमध्ये लढाई केली आहे. परंतु आता मला माझेच राज्य युद्ध मैदानाहून अधिक धोकादायक वाटते असं विधान निवृत्त सैनिकाने केले आहे.

संतप्त प्रकारानंतर महिला मानसिक तणावाखाली

४२ वर्षीय महिलेने सांगितले की, आम्हा दोघींना हजारो पुरुषांसमोर बंदुकीच्या धाकावर कपडे बळजबरीने उतरवण्यास भाग पाडले. हे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला नग्न केले, धक्काबुक्की केली, रस्त्यावरून फिरवले असं म्हटलं. तर या प्रकारामुळे पत्नी मानसिक तणावाखाली आली. ३-४ मे रोजी हजारो लोकांच्या जमावाने आमच्या गावावर हल्ला केला. घर, चर्च जाळली, पाळीव प्राण्यांनाही सोडले नाही. घरे जाळायला लागल्यावर ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले. त्यात माझी पत्नी आणि मी दुरावलो. ती आणि अन्य ४ जण जंगलात एका झाडामागे लपले होते. काही लोक त्यांच्या मागावर होते. त्यांना लोकांनी पकडले. ३ महिलांचे कपडे उतरवले, एका मुलीसोबत अतिप्रसंग होत होता, त्याला बाप-लेकाने विरोध केला तर जमावाने त्यांनाही ठार केले. तक्रारीच्या आधारे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटलं आहे की, २१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलगी बेपत्ता असल्याने गँगरेपची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दोन ते तीन तास हा खेळ सुरू होता. जमाव हिंसक झाल्यावर सर्व गावकरी घटनास्थळावरून पळून गेले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार