शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

कारगिलमध्ये देशाला वाचवलं पण पत्नीला वाचवू शकलो नाही; माजी सैनिकाची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 10:17 IST

२१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला

इंफाल – मणिपूरच्या घटनेने इतकं दु:ख झालंय ते शब्दात सांगता येत नाही. कारगिलमध्ये देशाच्या रक्षणासाठी लढलो पण आता निवृत्त झाल्यानंतर पत्नीचं रक्षण करता आले नाही. एका महिलेचे कपडे उतरवून जमावाने जे कृत्य केले त्याचा विचारही केला नव्हता अशा शब्दात माजी सैनिकाने त्यांच्यावर घडलेल्या प्रसंगावर भाष्य केले आहे. मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणी मुख्य आरोपीसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

मणिपूरच्या घटनेत एकूण ३ महिलांपैकी २ महिलांना नग्न करून रस्त्यावरून फिरवले. FIR मध्ये असा उल्लेख आहे की, तिसऱ्या महिलेला कपडे काढण्यास मजबूर केले परंतु व्हिडिओत ती दिसली नाही. भारतीय सैन्यात सुभेदार पदावरून निवृत्त झालेले महिलेचे पती ज्यांनी कारगिल युद्धही लढले आहे. मणिपूरच्या हिंसाचारात त्यांचे घर, संपत्ती आणि आता इज्जतही गेली आहे. मी युद्ध पाहिले आहे. कारगिलमध्ये लढाई केली आहे. परंतु आता मला माझेच राज्य युद्ध मैदानाहून अधिक धोकादायक वाटते असं विधान निवृत्त सैनिकाने केले आहे.

संतप्त प्रकारानंतर महिला मानसिक तणावाखाली

४२ वर्षीय महिलेने सांगितले की, आम्हा दोघींना हजारो पुरुषांसमोर बंदुकीच्या धाकावर कपडे बळजबरीने उतरवण्यास भाग पाडले. हे केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी आम्हाला नग्न केले, धक्काबुक्की केली, रस्त्यावरून फिरवले असं म्हटलं. तर या प्रकारामुळे पत्नी मानसिक तणावाखाली आली. ३-४ मे रोजी हजारो लोकांच्या जमावाने आमच्या गावावर हल्ला केला. घर, चर्च जाळली, पाळीव प्राण्यांनाही सोडले नाही. घरे जाळायला लागल्यावर ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले. त्यात माझी पत्नी आणि मी दुरावलो. ती आणि अन्य ४ जण जंगलात एका झाडामागे लपले होते. काही लोक त्यांच्या मागावर होते. त्यांना लोकांनी पकडले. ३ महिलांचे कपडे उतरवले, एका मुलीसोबत अतिप्रसंग होत होता, त्याला बाप-लेकाने विरोध केला तर जमावाने त्यांनाही ठार केले. तक्रारीच्या आधारे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटलं आहे की, २१ वर्षीय तरुणीवर नंतर दिवसाढवळ्या क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलगी बेपत्ता असल्याने गँगरेपची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. दोन ते तीन तास हा खेळ सुरू होता. जमाव हिंसक झाल्यावर सर्व गावकरी घटनास्थळावरून पळून गेले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार