शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

मणिपूरमध्येही भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

By admin | Updated: March 14, 2017 00:30 IST

गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत बाजी मारली असून, विधानसभा निवडणुकीत २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने

इम्फाळ : गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत बाजी मारली असून, विधानसभा निवडणुकीत २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप विधिमंडळ नेतेपदी एन. वीरेनसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्ष आणि एक अपक्ष असे बहुमताचं गणित जमवत भाजपने ३१ ची मॅजिक फिगर पार केली असून, तब्बल ३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रच त्यांनी राज्यपालांना सादर केले आहे. पक्षनिरीक्षक केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोएल यांनी सांगितले की एन विरेन यांना सर्वसंमतीने भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ नेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तेच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री इबोबी सिंग उद्या राजीनाम देणार आहेत.मावळत्या विधानसभेत एकही आमदार नसलेल्या भाजपने मणिपूरमध्ये ऐतिहासिक यश मिळवत तब्बल २१ जागा जिंकल्या आहेत. प्रत्येकी चार जागा जिंकणाऱ्या नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) व नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) भाजपला पाठिंबा दिला आहे. या आठजणांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा आकडा २९ वर पोहोचतो. केंद्रात सत्तेत सहभागी असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्षाचा एक आमदार निवडून आला असून त्याने भाजपलाच पाठिंबा दिला आहे. तसेच तृणमूल काँग्रेस व एका अपक्षानेही भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ३२वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठताच भाजपने वेळ न दवडता राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून सरकार स्थापनेसाठी आम्हालाच आधी निमंत्रण मिळाले पाहिजे, असे इबोबी सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपने ३२ जणांची यादीच दिल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. राज्यपाल आता नेमकी कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.