शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

मणिपूरमध्येही भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

By admin | Updated: March 14, 2017 00:30 IST

गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत बाजी मारली असून, विधानसभा निवडणुकीत २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने

इम्फाळ : गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत बाजी मारली असून, विधानसभा निवडणुकीत २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप विधिमंडळ नेतेपदी एन. वीरेनसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्ष आणि एक अपक्ष असे बहुमताचं गणित जमवत भाजपने ३१ ची मॅजिक फिगर पार केली असून, तब्बल ३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रच त्यांनी राज्यपालांना सादर केले आहे. पक्षनिरीक्षक केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोएल यांनी सांगितले की एन विरेन यांना सर्वसंमतीने भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ नेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तेच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री इबोबी सिंग उद्या राजीनाम देणार आहेत.मावळत्या विधानसभेत एकही आमदार नसलेल्या भाजपने मणिपूरमध्ये ऐतिहासिक यश मिळवत तब्बल २१ जागा जिंकल्या आहेत. प्रत्येकी चार जागा जिंकणाऱ्या नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) व नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) भाजपला पाठिंबा दिला आहे. या आठजणांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा आकडा २९ वर पोहोचतो. केंद्रात सत्तेत सहभागी असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्षाचा एक आमदार निवडून आला असून त्याने भाजपलाच पाठिंबा दिला आहे. तसेच तृणमूल काँग्रेस व एका अपक्षानेही भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ३२वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठताच भाजपने वेळ न दवडता राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून सरकार स्थापनेसाठी आम्हालाच आधी निमंत्रण मिळाले पाहिजे, असे इबोबी सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपने ३२ जणांची यादीच दिल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. राज्यपाल आता नेमकी कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.