शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

इंदिरा गांधींचा कल मनेका यांच्याकडे होता!

By admin | Updated: May 13, 2016 07:41 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती.

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती. परंतु मनेका गांधी त्या वेळी राजीव गांधी यांच्या विरोधकांच्या गोतावळ्यात अडकल्या होत्या. अर्थात इंदिराजींना सोनियांबद्दल जिव्हाळा होता. पण संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मनेकांबद्दल जास्त आपुलकी वाटायला लागली होती. इंदिरा गांधींचे खासगी आरोग्य चिकित्सक के.पी. माथुर यांनी ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या त्यांच्या पुस्तकात उपरोक्त दावा केला आहे. सफदरजंग इस्पितळातील माजी डॉक्टर माथुर हे जवळपास २० वर्षे इंदिराजींचे डॉक्टर होते. ते दररोज सकाळी इंदिराजींना भेटत असत आणि १९८४ साली इंदिराजींच्या निधनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. या काळातील इंदिराजींसोबतचे आपले अनुभव त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत. इंदिराजींचे हे प्रेम, जिव्हाळा मनेका यांना त्यांच्याजवळ आणू शकला नाही. सोनिया सर्वसाधारणपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असत आणि राजकीय मुद्द्यांवर मात्र मनेका यांचे मत माजी पंतप्रधान लक्षात घेत. मनेका यांना राजकारणाची चांगली समज होती. पण संजय गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षांतच मनेका यांनी परिस्थितीशी जुळवून न घेता पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले, असेही या पुस्तकात नमूद आहे. डॉ. माथुर यांच्या सांगण्यानुसार, मनेका नेहमीच राजीव गांधी यांच्या विरोधकांसोबत राहिल्या. यातूनच संजय विचार मंच उदयास आला होता. परंतु मनेका आणि त्यांचे राजीवविरोधी सहकारी या मंचच्या माध्यमाने नेमके काय काम करीत होते हे त्यांना कधीच कळले नाही. संजय विचार मंचच्या लखनौमध्ये झालेल्या संमेलनाचाही या पुस्तकात उल्लेख आहे. इंदिरा गांधी त्या वेळी विदेश दौऱ्यावर होत्या. तेथून त्यांनी मनेका यांना या संमेलनाला मार्गदर्शन न करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु मनेका यांनी त्यांची सूचना धुडकावून संमेलनात भाषण दिले होते. >पुस्तकानुसार राजीव-सोनिया यांच्या लग्नानंतर सासू-सुनेदरम्यान सामंजस्य होते. सोनिया गांधी आपल्या सासूबार्इंचा आदर करायच्या. अत्यल्प कालावधीतच त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. वाचनाची आवड असलेल्या इंदिराजी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी पुस्तके वाचत असत. >1966 साली पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर इंदिरा गांधींची सुरुवातीच्या काळातील तणाव, पोखरण चाचणीनंतरची मन:स्थिती, आणीबाणीचा काळ आदी महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना इंदिरा गांधींची नात प्रियंका वाड्रा यांनी लिहिली आहे.