शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधींचा कल मनेका यांच्याकडे होता!

By admin | Updated: May 13, 2016 07:41 IST

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती.

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुत्र संजय यांच्या निधनानंतर त्यांच्या लहान सूनबार्इंनी त्यांना राजकारणात मदत करावी अशी इच्छा होती. परंतु मनेका गांधी त्या वेळी राजीव गांधी यांच्या विरोधकांच्या गोतावळ्यात अडकल्या होत्या. अर्थात इंदिराजींना सोनियांबद्दल जिव्हाळा होता. पण संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मनेकांबद्दल जास्त आपुलकी वाटायला लागली होती. इंदिरा गांधींचे खासगी आरोग्य चिकित्सक के.पी. माथुर यांनी ‘द अनसीन इंदिरा गांधी’ या त्यांच्या पुस्तकात उपरोक्त दावा केला आहे. सफदरजंग इस्पितळातील माजी डॉक्टर माथुर हे जवळपास २० वर्षे इंदिराजींचे डॉक्टर होते. ते दररोज सकाळी इंदिराजींना भेटत असत आणि १९८४ साली इंदिराजींच्या निधनापर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. या काळातील इंदिराजींसोबतचे आपले अनुभव त्यांनी या पुस्तकातून शब्दबद्ध केले आहेत. इंदिराजींचे हे प्रेम, जिव्हाळा मनेका यांना त्यांच्याजवळ आणू शकला नाही. सोनिया सर्वसाधारणपणे कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असत आणि राजकीय मुद्द्यांवर मात्र मनेका यांचे मत माजी पंतप्रधान लक्षात घेत. मनेका यांना राजकारणाची चांगली समज होती. पण संजय गांधी यांच्या निधनानंतर काही वर्षांतच मनेका यांनी परिस्थितीशी जुळवून न घेता पंतप्रधानांचे निवासस्थान सोडले, असेही या पुस्तकात नमूद आहे. डॉ. माथुर यांच्या सांगण्यानुसार, मनेका नेहमीच राजीव गांधी यांच्या विरोधकांसोबत राहिल्या. यातूनच संजय विचार मंच उदयास आला होता. परंतु मनेका आणि त्यांचे राजीवविरोधी सहकारी या मंचच्या माध्यमाने नेमके काय काम करीत होते हे त्यांना कधीच कळले नाही. संजय विचार मंचच्या लखनौमध्ये झालेल्या संमेलनाचाही या पुस्तकात उल्लेख आहे. इंदिरा गांधी त्या वेळी विदेश दौऱ्यावर होत्या. तेथून त्यांनी मनेका यांना या संमेलनाला मार्गदर्शन न करण्याचा सल्लाही दिला होता. परंतु मनेका यांनी त्यांची सूचना धुडकावून संमेलनात भाषण दिले होते. >पुस्तकानुसार राजीव-सोनिया यांच्या लग्नानंतर सासू-सुनेदरम्यान सामंजस्य होते. सोनिया गांधी आपल्या सासूबार्इंचा आदर करायच्या. अत्यल्प कालावधीतच त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. वाचनाची आवड असलेल्या इंदिराजी रविवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी पुस्तके वाचत असत. >1966 साली पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर इंदिरा गांधींची सुरुवातीच्या काळातील तणाव, पोखरण चाचणीनंतरची मन:स्थिती, आणीबाणीचा काळ आदी महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना इंदिरा गांधींची नात प्रियंका वाड्रा यांनी लिहिली आहे.