शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रेमासाठी कायपण; गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी 'त्याने' केलं तिच्या पुतण्याचंच अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 13:12 IST

२४ तासांमध्ये अपहरण झालेल्या मुलाची सुटका

आधी अपहरण, मग केली जाणारी पैशांची मागणी, अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र तेलंगणातील एका कुटुंबाकडे अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या सुटकेसाठी एक अजब मागणी करण्यात आली. मुलगा सुखरुप हवा असेल, तर माझ्या प्रेमात आडवे येऊ नका. माझी गर्लफ्रेंड मला हवी आहे, अशी मागणी अपहरणकर्त्याने कुटुंबाकडे केली. या अपहरणकर्त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याने त्याच्या प्रेयसीसाठी हा संपूर्ण प्रकार केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तेलंगणातील वानपर्ती जिल्ह्यातील कोथाकोटामधून आठ वर्षांच्या चंद्रू नायकचे ७ एप्रिल रोजी शाळेतून अपहरण झाले होते. महबूबनगरमध्ये राहणाऱ्या २३ वर्षांच्या वामसी कृष्णने चंद्रूचे अपहरण केले. अपहरण केलेल्या चंद्रूच्या आत्येसोबत वामसीचे प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरी याबद्दलची कुणकुण लागताच त्यांनी वामसीला मारहाण केली आणि पुन्हा जवळपास दिसू नकोस, अशी  धमकीदेखील दिली. त्यामुळे प्रेयसीच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी आणि दुरावलेले प्रेम परत मिळवण्यासाठी चंद्रूचे अपहरण केले. यानंतर वामसीने कोथाकोटा बस स्थानकातून चंद्रूच्या घरी फोन करुन अपहरण झाल्याची माहिती दिली. 'चंद्रू सुखरुप हवा असेल, तर माझ्या गर्लफ्रेंडला माझ्याकडे पाठवा,' अशी धमकीच वामसीने चंद्रूच्या कुटुंबीयांना दिली. वामसीने अनेकदा फोन करुन पीडित कुटुंबाला त्रास दिला. यानंतर कुटुंबाने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करुन वामसीचा पाठलाग सुरु केला. आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वामसी पुणे स्थानकात उतरताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि अपहृत मुलाची सुटका केली.  

टॅग्स :Kidnappingअपहरण