शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख रुपये; राखणीसाठी ३ सुरक्षा रक्षक, ९ श्वान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:47 IST

भारतात पिकणाऱ्या आंब्याला लाखमोलाचा भाव; सुरक्षेसाठी खास बंदोबस्त तैनात

रसाळ, मधूर आंबा कोणाला आवडत नाही. अनेकांना उन्हाळा ऋतू आवडण्यामागचं कारण त्या मोसमात येणारे आंबे. महागाई कितीही वाढली तरीही अनेकजण आंबा खातात. कारण हौसेला मोल नसतं. मार्च महिना संपत आला असताना बाजारात फळांचा राजा दिसू लागला आहे. देशात विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं जातं. त्यांच्या किमतींमध्येही मोठी तफावत असते.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पिकणारा 'ताईयो नो तामागो' आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खातो. एका आंब्याला तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा भाव मिळतो. मुख्यत: हा आंबा जपानमध्ये पिकतो. मात्र आता जबलपूरमध्येही त्याची शेती होऊ लागली आहे. लाखमोलाचा असल्यानं आंब्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. 

जबलपूरचे संकल्प परिहार 'ताईयो नो तामागो' आंब्याचं उत्पादन घेतात. या आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बागेत ३ सुरक्षा रक्षक आणि ९ श्वान तैनात ठेवले आहेत. या आंब्याला एग ऑफ सन म्हणजेच सूर्याचं अंडदेखील म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी बागेत चोरी झाली होती. तेव्हापासून बागेत सुरक्षा रक्षक तैनान करण्यात आले.

पूर्णपणे पिकल्यावर 'ताईयो नो तामागो' आंब्याचं वजन ९०० ग्रॅमच्या आसपास जातं. त्याचा रंग फिकट पिवळा आणि लाल होतो. हा आंबा अतिशय गोड लागतो. जपानमध्ये पॉलीहाऊसमध्ये या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र संकल्प परिहार यांनी उजाड जमिनीवर या आंब्याची शेती केली आहे. चार एकरवर त्यांनी आंब्यांची लागवड केली आहे. १४ विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन ते घेतात. 'ताईयो नो तामागो'ची ५२ झाडं त्यांनी लावली आहेत.