शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख रुपये; राखणीसाठी ३ सुरक्षा रक्षक, ९ श्वान तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 12:47 IST

भारतात पिकणाऱ्या आंब्याला लाखमोलाचा भाव; सुरक्षेसाठी खास बंदोबस्त तैनात

रसाळ, मधूर आंबा कोणाला आवडत नाही. अनेकांना उन्हाळा ऋतू आवडण्यामागचं कारण त्या मोसमात येणारे आंबे. महागाई कितीही वाढली तरीही अनेकजण आंबा खातात. कारण हौसेला मोल नसतं. मार्च महिना संपत आला असताना बाजारात फळांचा राजा दिसू लागला आहे. देशात विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं जातं. त्यांच्या किमतींमध्येही मोठी तफावत असते.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पिकणारा 'ताईयो नो तामागो' आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खातो. एका आंब्याला तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा भाव मिळतो. मुख्यत: हा आंबा जपानमध्ये पिकतो. मात्र आता जबलपूरमध्येही त्याची शेती होऊ लागली आहे. लाखमोलाचा असल्यानं आंब्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. 

जबलपूरचे संकल्प परिहार 'ताईयो नो तामागो' आंब्याचं उत्पादन घेतात. या आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बागेत ३ सुरक्षा रक्षक आणि ९ श्वान तैनात ठेवले आहेत. या आंब्याला एग ऑफ सन म्हणजेच सूर्याचं अंडदेखील म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी बागेत चोरी झाली होती. तेव्हापासून बागेत सुरक्षा रक्षक तैनान करण्यात आले.

पूर्णपणे पिकल्यावर 'ताईयो नो तामागो' आंब्याचं वजन ९०० ग्रॅमच्या आसपास जातं. त्याचा रंग फिकट पिवळा आणि लाल होतो. हा आंबा अतिशय गोड लागतो. जपानमध्ये पॉलीहाऊसमध्ये या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र संकल्प परिहार यांनी उजाड जमिनीवर या आंब्याची शेती केली आहे. चार एकरवर त्यांनी आंब्यांची लागवड केली आहे. १४ विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन ते घेतात. 'ताईयो नो तामागो'ची ५२ झाडं त्यांनी लावली आहेत.