शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

“ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून 'गॉड'नं माझ्यावर दया दाखवली”; गावकऱ्यांनी केला बहिष्कार

By प्रविण मरगळे | Updated: January 20, 2021 15:14 IST

नहतौर पोलिस ठाण्यांतर्गत हरगनपूर गावात सोमवारी पंचायत घेण्यात आली

ठळक मुद्देधर्म बदलणे ही चांगली गोष्ट नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते मान्य नव्हते. आता मी ख्रिस्ती धर्माचा अनुयायी आहे. पूर्वी मी आजारी असायचोजेव्हा मी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा गॉडने माझ्यावर दया दाखवली, आता मी आता स्वस्थ आहे.

बिजनौर – जिल्ह्यातील नहतौर भागात एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांचा असा आरोप आहे की,  गावात अलीकडेच एक बैठक घेण्यात आली. ज्यात धार्मिक साहित्य आणि काही अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु पीडित व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारे तक्रार नोंद करण्यात आली नाही.

नहतौर पोलिस ठाण्यांतर्गत हरगनपूर गावात सोमवारी पंचायत घेण्यात आली, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ख्रिश्चन धर्माचे काही लोक परमसिंह सैनी नावाच्या व्यक्तीच्या घरी येतात, दर रविवारी त्यांच्याकडे धार्मिक विधी करत असतात. जेव्हा गावकऱ्यांनी याचा निषेध केला तेव्हा सैनीने स्वतःला ख्रिश्चन असल्याचं सांगितले, आणि त्याचसोबत माझ्या कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावर गावातील सरपंच सतीश कुमार म्हणाले, “जेव्हा परमसिंह सैनी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेव्हा आम्ही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला की धर्म बदलणे ही चांगली गोष्ट नाही पण त्याला ते मान्य नव्हते. त्यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकत्रितपणे सैनीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. आता गावातील कोणीही सैनीच्या कुटुबाशी बोलणार नाही असं या बैठकीत ठरवलं.

दुसरीकडे परमसिंह सैनी म्हणाले, आता मी ख्रिस्ती धर्माचा अनुयायी आहे. पूर्वी मी आजारी असायचो. जेव्हा मी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा गॉडने माझ्यावर दया दाखवली, आता मी आता स्वस्थ आहे. भारतीय घटनेने मला कोणत्याही धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. काही गावक्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला आहे, ही त्यांची इच्छा आहे, परंतु माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे मी स्वागत करीन असं सैनी म्हणाले आहेत.

तर आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. पोलीस अधिकारी गावात जाऊन सैनी यांना भेटले आहेत. त्यांनी धर्मांतर केले नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो काही आजाराने ग्रस्त होता. त्यानंतर तो देहरादूनमध्ये काही लोकांशी भेटला ज्यांनी त्याच्यावर उपचार केले. आता तो आजारातून मुक्त झाला आहे असं सैनी यांनी सांगितले. तसेच मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आहे पण धर्म बदलला नाही असं सैनी यांचे म्हणणं आहे, मात्र सैनी यांनी गावकऱ्यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल केली नाही असं बिजनौर एसपी धरमवीर सिंह म्हणाले.

टॅग्स :HinduहिंदूPoliceपोलिस