शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ममता दीदी चेहऱ्यावर हसू फुलवा, लोकशाहीत आलाय...दिल्लीत बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 09:09 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी त्या जंतरमंतरवर धरणे करणार आहेत. या रॅलीचे आयोजन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील हजर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बॅनर्जींच्या स्वागताचे आणि खिल्ली उडविणारे बॅनर झळकू लागले आहेत. 

कोलकाता आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी छापा टाकण्यास गेल्यावरून गेल्या आठवड्यात बंगालमध्ये वातावरण तापले होते. यावेळी ममता यांनी दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 19 जानेवारीला झालेल्या एका रॅलीमध्ये 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामुळे आजचे हे आंदोलनही विरोधी पक्षांची एकजूट दाखविण्यासाठी माध्यम बनणार आहे. 

कोलकाताहून दिल्लीला येण्याआधी ममता यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट संपली आहे. 15 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. निवडणुकीनंतर आम्ही नवीन सरकार बनलेली पाहू. देश बदल पाहू इच्छितो. देशातील जनता त्या अखंड भारताला पाहू इच्छितो, जेथे लोकशाही कायम असेल. 

ममता यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांच्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि गुजरातला परतावे. हे सरकार एक व्यक्ती आणि एका पक्षाची सरकार आहे, असा आरोप केला होता. या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच देशाची बिग बॉस आहे, असं म्हणत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा आमच्यासाठी नैतिक विजय आहे. केंद्र सरकारकडून घटनेचं उल्लंघन सुरू आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करू. कोणीही या देशाचं बिग बॉस होऊ शकत नाही. केवळ लोकशाहीच इथली बिग बॉस आहे,' असं ममता म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयात आज जे काही झालं, तो देशाचा, घटनेचा, तरुणांचा विजय आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdemocracyलोकशाहीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल