शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ममता दीदी चेहऱ्यावर हसू फुलवा, लोकशाहीत आलाय...दिल्लीत बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 09:09 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीमध्ये संविधान आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी त्या जंतरमंतरवर धरणे करणार आहेत. या रॅलीचे आयोजन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील हजर राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बॅनर्जींच्या स्वागताचे आणि खिल्ली उडविणारे बॅनर झळकू लागले आहेत. 

कोलकाता आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी छापा टाकण्यास गेल्यावरून गेल्या आठवड्यात बंगालमध्ये वातावरण तापले होते. यावेळी ममता यांनी दोन दिवसांच्या धरणे आंदोलनामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच 19 जानेवारीला झालेल्या एका रॅलीमध्ये 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. यामुळे आजचे हे आंदोलनही विरोधी पक्षांची एकजूट दाखविण्यासाठी माध्यम बनणार आहे. 

कोलकाताहून दिल्लीला येण्याआधी ममता यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांना माहिती आहे की ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत. त्यांची एक्स्पायरी डेट संपली आहे. 15 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. निवडणुकीनंतर आम्ही नवीन सरकार बनलेली पाहू. देश बदल पाहू इच्छितो. देशातील जनता त्या अखंड भारताला पाहू इच्छितो, जेथे लोकशाही कायम असेल. 

ममता यांनी यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्या आहेत. केंद्र सरकार राज्यांच्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि गुजरातला परतावे. हे सरकार एक व्यक्ती आणि एका पक्षाची सरकार आहे, असा आरोप केला होता. या देशाचा कोणीही बिग बॉस नाही, लोकशाहीच देशाची बिग बॉस आहे, असं म्हणत ममता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. 'सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलेले मुद्दे हा आमच्यासाठी नैतिक विजय आहे. केंद्र सरकारकडून घटनेचं उल्लंघन सुरू आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करू. कोणीही या देशाचं बिग बॉस होऊ शकत नाही. केवळ लोकशाहीच इथली बिग बॉस आहे,' असं ममता म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयात आज जे काही झालं, तो देशाचा, घटनेचा, तरुणांचा विजय आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdemocracyलोकशाहीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल