शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

जनता विरोधात गेल्याने ममतांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:50 IST

नरेंद्र मोदी : घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित

कुचबिहार : केंद्रीय योजनांचा अन्य राज्यांना मिळत असलेला लाभ विकासाच्या मार्गातील गतिरोधक बनलेल्या ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालला मिळू शकला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यातील जनता विरोधात गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची घाबरगुंडी उडाल्याचा दावाही मोदी यांनी केला.

येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होणार हे कळून चुकल्याने ममता बॅनर्जी त्याचा सारा राग पश्चिम बंगालमधील सरकारी अधिकाऱ्यांवर तसेच निवडणूक आयोगावर काढत आहेत. कुचबिहारमधील सभेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू नयेत म्हणून राज्य सरकारने नाना उपाय करून पाहिले. परंतु अशा बालिश वर्तनाने निवडणुका जिंकता येत नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या जुलमी राजवटीपासून पश्चिम बंगालमधील जनतेला मुक्तता हवी आहे. इथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे राज्य सुरू असून त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी लोक आता समर्थ पर्यायाच्या शोधात आहेत. गरीबातल्या गरीब माणसाचे बँकखाते आता उघडण्यात आले असून हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्य झाले. प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस, मोबाइल फोन, इंटरनेट पाहायला मिळते ते आमच्याच सरकारमुळे. ममता बॅनर्जी गतिरोधकाची भूमिका बजावत असून त्यांनी राज्याच्या विकासात अडथळे निर्माण केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित झाली आहे.भाजपच्या प्रत्येक कामगिरीवर टीकामोदी यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ले चढविले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक कामगिरीवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानपद पुन्हा निर्माण करावे अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. एकाच देशात दोन पंतप्रधान असावेत, अशी मागणी करणाऱ्या लोकांसोबत ममता बॅनर्जी यांनी राजकीय हातमिळवणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी