शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जनता विरोधात गेल्याने ममतांची घाबरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:50 IST

नरेंद्र मोदी : घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित

कुचबिहार : केंद्रीय योजनांचा अन्य राज्यांना मिळत असलेला लाभ विकासाच्या मार्गातील गतिरोधक बनलेल्या ममता बॅनर्जींमुळे पश्चिम बंगालला मिळू शकला नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्यातील जनता विरोधात गेल्यामुळे ममता बॅनर्जी यांची घाबरगुंडी उडाल्याचा दावाही मोदी यांनी केला.

येथील प्रचारसभेत ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव होणार हे कळून चुकल्याने ममता बॅनर्जी त्याचा सारा राग पश्चिम बंगालमधील सरकारी अधिकाऱ्यांवर तसेच निवडणूक आयोगावर काढत आहेत. कुचबिहारमधील सभेसाठी लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू नयेत म्हणून राज्य सरकारने नाना उपाय करून पाहिले. परंतु अशा बालिश वर्तनाने निवडणुका जिंकता येत नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या जुलमी राजवटीपासून पश्चिम बंगालमधील जनतेला मुक्तता हवी आहे. इथे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचे राज्य सुरू असून त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी लोक आता समर्थ पर्यायाच्या शोधात आहेत. गरीबातल्या गरीब माणसाचे बँकखाते आता उघडण्यात आले असून हे केवळ भाजप सरकारमुळेच शक्य झाले. प्रत्येक घरात स्वयंपाकाचा गॅस, मोबाइल फोन, इंटरनेट पाहायला मिळते ते आमच्याच सरकारमुळे. ममता बॅनर्जी गतिरोधकाची भूमिका बजावत असून त्यांनी राज्याच्या विकासात अडथळे निर्माण केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या घोटाळ्यांमुळे पश्चिम बंगालची प्रतिमा कलंकित झाली आहे.भाजपच्या प्रत्येक कामगिरीवर टीकामोदी यांनी सांगितले की, पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाने हल्ले चढविले. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक कामगिरीवर ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. जम्मू-काश्मीरसाठी पंतप्रधानपद पुन्हा निर्माण करावे अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली होती. एकाच देशात दोन पंतप्रधान असावेत, अशी मागणी करणाऱ्या लोकांसोबत ममता बॅनर्जी यांनी राजकीय हातमिळवणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी