शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्कार, सातवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:09 IST

उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी भाजपने बुधवारी (28 फेब्रुवारी 2024) बंगाल बंद केला होता. दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गोळीबाराच्या बातम्याही आल्या होत्या. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, लक्षात ठेवा, जर बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील, असे विधान केले होते.

प्रक्षोभक वक्तव्य - यानंतर, एका वकिलाने मुख्यमंत्री ममतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे.

वकील विनीत जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता यांचे विधान प्रक्षोभक होते. यामुळे द्वेष आणि शत्रुत्व वाढेल. त्यांचे विधान सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे होते. कारण त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्यांचा प्रभाव पडतो, जो धोकादायक ठरू शकतो."

जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता बॅनर्जी यांनी आपल्या विधानात दिल्लीचा उल्लेख अशा राज्यांसोबत केला, ज्यांना त्यांनी इशारा दिला. मी दिल्लीचा नागरिक असल्याच्या नात्याने बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बीएनएसच्या कलम 152, 192, 196 आणि 353 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. अत्यंत गंभीर गुन्हा आहे."

काय म्हणाल्या होत्या ममता? -बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांगलादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांगलादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्लीCourtन्यायालय