शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ...! "संपूर्ण ईशान्य जळेल", विधानाविरोधात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:09 IST

उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी भाजपने बुधवारी (28 फेब्रुवारी 2024) बंगाल बंद केला होता. दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळ आणि गोळीबाराच्या बातम्याही आल्या होत्या. यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, लक्षात ठेवा, जर बंगाल जळला तर आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील, असे विधान केले होते.

प्रक्षोभक वक्तव्य - यानंतर, एका वकिलाने मुख्यमंत्री ममतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल यांनी, ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य प्रक्षोभक होते आणि त्यांनी अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले, असा आरोप केला आहे.

वकील विनीत जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता यांचे विधान प्रक्षोभक होते. यामुळे द्वेष आणि शत्रुत्व वाढेल. त्यांचे विधान सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारे होते. कारण त्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या वक्तव्यांचा प्रभाव पडतो, जो धोकादायक ठरू शकतो."

जिंदल यांनी म्हटले आहे, "ममता बॅनर्जी यांनी आपल्या विधानात दिल्लीचा उल्लेख अशा राज्यांसोबत केला, ज्यांना त्यांनी इशारा दिला. मी दिल्लीचा नागरिक असल्याच्या नात्याने बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बीएनएसच्या कलम 152, 192, 196 आणि 353 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. अत्यंत गंभीर गुन्हा आहे."

काय म्हणाल्या होत्या ममता? -बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांगलादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांगलादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्लीCourtन्यायालय