शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

ममता बॅनर्जी यांनी केंद्राला फटकारले

By admin | Updated: July 9, 2017 03:13 IST

गोरखालँडच्या आंदोलनाला भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची चिथावणी असल्याचा आरोप करतानाच, राज्याने विनंती केली नसतानाही केंद्र सरकारने लष्कर पाठविले

कोलकाता : गोरखालँडच्या आंदोलनाला भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांची चिथावणी असल्याचा आरोप करतानाच, राज्याने विनंती केली नसतानाही केंद्र सरकारने लष्कर पाठविले आहे आणि केंद्र राज्यांच्या स्वायत्ततेत हस्तक्षेप करीत आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्राला फटकारले. गोरखालँडचे नेते आम्हाला भाजपाचा पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. दुसरीकडे भाजपा मात्र भूमिका घेताना दिसत नाही. भाजपाच्या छोट्या राज्यांबाबतचे धोरण पाहता, गोरखालँडच्या समर्थकांना भाजपाचा छुपा पाठिंबा असावा, असे सुरुवातीपासून सर्रास बोलले जात होते. बशीरहाट व बदुरिया येथील वातावरण बिघडविण्यास आणि तिथे धार्मिक विद्वेष निर्माण करण्यास काही संघटना जबाबदार आहेत, असे सांगून, त्यांनी त्याबद्दलही नाव न घेता भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या, दोन धार्मिक संघटनांवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. बशीरहाट व बदुरिया येथील दंगलींची न्यायालयीन चौकशी केली जाईल. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यात केंद्र सरकार आम्हाला मदत करीत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.सीमा सुरक्षेचे प्रभारी कोण आहे? केंद्र की राज्य? असा सवाल करून त्या म्हणाल्या की, राज्यात शांतताभंंग करणे हे भाजपाचे कटकारस्थान आहे. दंगलीच्या काळात खोटे चित्रण दाखवून वातावरण बिघडवू पाहणाऱ्या दोन राष्ट्रीय टीव्ही चॅनलच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. (वृत्तसंस्था)ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली. त्या म्हणाल्या की, मोदी सरकार आणि भाजपा येथे शांतताभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीमेपलीकडून लोकांना राज्यात प्रवेश दिला जात असून, येथील सांघिक रचनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. बशीरहाटमध्ये येत असलेल्या भाजपाच्या एका तीन सदस्यीय टीमला रोखण्यात आले आहे. परिस्थिती बिघडविण्यास कारणीभूत ठरणारी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.तीन खासदारांना अटकभाजपाच्या खासदारांचे शिष्टमंडळ आज बशीरहाट येथे भेटीसाठी निघाले असता, त्यांना अडविण्यात आले. शिष्टमंडळात भाजपाच्या खा. मीनाक्षी लेखी, ओम माथूर व सत्यपाल सिंग यांचा समावेश होता. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तेथील लोकांना त्रस्त करण्याची काय गरज आहे? तृणमूलचे खासदारही तेथे गेले नाहीत. राष्ट्रपती राजवट लागू करा : भाजपाराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपाच्या राज्य शाखेने केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, आम्ही राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली आणि राज्यातील गंभीर स्थितीसाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगितले. दंगलग्रस्त भागातील लोकांना भरपाई देण्याची मागणीही भाजपाने केली आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला मदत करत नाही, हा ममता बॅनर्जी यांचा आरोपही घोष यांनी फेटाळून लावला.