शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

ममता बॅनर्जींना गंभीर दुखापत, घात की अपघात? या ५ प्रश्नांनी वाढवलं घटनेचं गुढ, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 17:54 IST

Mamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे.   

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काल राहत्या घरी गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारांसाठी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांच्या डोक्याला चार टाके घालावे लागले आहेत. उपचारांनंतर ममता बॅनर्जी यांना घरी पाठवण्यात आले. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदी असलेल्या ममता बॅनर्जी यांना राहत्या घरी झालेल्या दुखापतीबाबत काही प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांमुळे या संपूर्ण प्रकरणाबाबतचं गुढ वाढलं आहे.   

मुख्यमंत्र्यांना रहस्यमय परिस्थितीमध्ये दुखापत झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास कुरू केला आहे. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणाऱ्या येणाऱ्यांची यादी तयार करत आहेत. या प्रकरणी सखोल तपास झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत काही प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक बनलं आहे.  यात पाच प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत. ते पुढीलप्रमाणे.

१ - ही घटना घडली तेव्हा ममता बॅनर्जी एकट्या नव्हत्या. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. ते सुद्धा ममता बॅनर्जींसोबत घरात फिरत होते. ममता बॅनर्जी या पाठीमागून धक्का लागल्याने पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा अपघात होता की हल्ला? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  २ - ममता बॅनर्जी यांच्यासोबत फिरत असलेली व्यक्ती चालता चालता अडखळून त्यांच्यावर पडली की, कुणी हल्लेखोर होता तो सुरक्षा व्यवस्था भेदून घरामध्ये कसा पोहोचला?३ - मुख्यमंत्री असल्याने ममता बॅनर्जी यांच्याकडे झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र ज्या प्रकारे मागून धक्का दिला गेला, असं ममता बॅनर्जींनी पोलीस आयुक्तांसमोर सांगितलं आहे, त्यामुळे सुरक्षेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.  ४ - ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याची माहिती रुग्णालयाबरोबरच तृणमूल काँग्रेसकडून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांचा व्हिडीओ शेअर केला होता. मात्र त्यानंतर या घटनेबाबत कुठलीही अधिकची माहिती देण्यात आलेली नाही. ५ - सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या घारामध्ये हल्लेखोर कसे घुसले आणि त्यांना धक्का देऊन कसे निघून गेले हा आहे. या दरम्यान, कुटुंबीयांचं सर्व लक्ष ममता बॅनर्जी यांच्यावरच होतं, असं मानलं तरी, हल्लेखोर सुरक्षा रक्षकांच्या नजरेत का आला नाही, हाही प्रश्न उपस्थित होतो. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल