शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 09:46 IST

mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांनी  (Mamata Banerjee)ही पोटनिवडणूक जिंकले नाही तर दुसरे कोणीतरी मुख्यमंत्री होईल, असे एक महत्वाचे विधान केले. ममता बॅनर्जी येथील जाहीर सभेत म्हणाल्या, 'मी जिंकले नाही तर दुसरा मुख्यमंत्री होईल. मला मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवण्यासाठी तुमचे मत द्या. प्रत्येक मत माझ्यासाठी मौल्यवान आहे, ते वाया घालवू नका.'

'...तर माझा पराभव होईल'पोटनिवडणूकीच्या प्रचार रॅलीदरम्यान स्वत: ला लोकांचा तारणहार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. त्या म्हणाल्या, "मला नंदीग्राममधून निवडणूक लढवण्यास सांगितले गेले, जिथे मी शेतकरी आंदोलनासाठी लढले, पण माझा तिथे कसा पराभव झाला, हे आपणा सर्वांना माहित आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तुम्हा सर्वांना लवकरच कळेल की, तेथे माझ्यासोबत काय झाले. पण आता मी इथे आहे .. कदाचित हे भाग्य असेल. मी तुम्हाला सोडू शकत नाही. प्रत्येक मत मौल्यवान आहे. त्यामुळे मी जिंकेन असाच विचार करून तुमचे मत वाया घालवू नका. जर तुम्ही मत दिले नाही तर माझा पराभव होईल." 

'देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही'केंद्रातील भाजपा सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी मोदी-शाह यांना दादा (भाऊ) म्हणू शकते,  हा शिष्टाचार आहे. मात्र मी देशात तालिबानी राजवट स्वीकारणार नाही. मी देश तोडू देणार नाही. मी राज्याचे तुकडे होऊ देणार नाही. मी सामान्य लोकांमध्ये फूट पडू देणार नाही. ते निरंकुश पद्धतीने सरकार चालवत आहेत. आम्हाला रॅली करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी अचानक त्रिपुरामध्ये कलम 144 लागू केले आहे. हे सर्व एका लोकशाही देशात चालू राहू शकत नाही.

'मताचा प्रभाव दिल्लीत दिसेल'याचबरोबर, आपल्या रॅलीमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'गरज पडल्यास त्रिपुरा, आसाम, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्येही असेच खेळ खेळले जातील. तुमचे मत दंगलखोरांना रोखण्यास मदत करेल. जर तुम्ही इथे मतदान केले तर तुम्हाला दिल्लीत याचा प्रभाव दिसेल. या तालिबानीवादाशी लढण्यासाठी मी कोणत्याही क्षेत्रात जाईन."

ममतांना निकालाची चिंतादरम्यान, ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणाले, “त्या यापूर्वी कधीही या स्थितीत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांना निवडणुकीच्या निकालाची चिंता वाटते. भवानीपूरमधील मागील निवडणुकांची आकडेवारी देखील दर्शवते की, त्या आपल्या विजयावरून पूर्णपणे समाधानी नाहीत."

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक