शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

"अत्याचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही", ममतांचा मणिपूर मुद्द्यावरून मोदींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:25 IST

ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे

मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांवर केंद्राने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, कारण त्यांचे सरकार पीएम केअर फंड, राफेल डील आणि नोटाबंदीसारख्या मुद्द्यांनी घेरलेले आहे, असेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  म्हटले आहे. 

ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे. भारतात भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरेंसचे कठोर धोरण असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान कोणत्याही पुराव्याशिवाय विरोधकांवर आरोप करत आहेत. कारण भाजपला देशातील गरीब लोक जगू इच्छित नाहीत. पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहेत. ते कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

देशात कोणीही राहू नये, अशी भाजपची इच्छा आहे. भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याने ते भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, मणिपूर प्रकरणावर आरोप करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने ईशान्येकडील मणिपूर राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच, पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 15-16 लोक मारले गेल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील ग्रामीण निवडणुकांदरम्यान ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर दहशत पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. ते म्हणाले होते की, असा धोका असूनही लोकांनी भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा वापर विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून करण्यात आला. मात्र असे असतानाही बंगालच्या जनतेने आपल्या प्रेमामुळे लोक जिंकले आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचार