शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

"अत्याचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही", ममतांचा मणिपूर मुद्द्यावरून मोदींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:25 IST

ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे

मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांवर केंद्राने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, कारण त्यांचे सरकार पीएम केअर फंड, राफेल डील आणि नोटाबंदीसारख्या मुद्द्यांनी घेरलेले आहे, असेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी  म्हटले आहे. 

ममता बॅनर्जी यांची ही प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी जी-20 भ्रष्टाचारविरोधी मंत्रिस्तरीय बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केल्यानंतर आली आहे. भारतात भ्रष्टाचाराविरुद्ध झिरो टॉलरेंसचे कठोर धोरण असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. पंतप्रधान कोणत्याही पुराव्याशिवाय विरोधकांवर आरोप करत आहेत. कारण भाजपला देशातील गरीब लोक जगू इच्छित नाहीत. पंतप्रधान देशाची दिशाभूल करत आहेत. ते कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत आहेत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.  

देशात कोणीही राहू नये, अशी भाजपची इच्छा आहे. भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याने ते भ्रष्टाचारावर बोलू शकत नाहीत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. याचबरोबर, मणिपूर प्रकरणावर आरोप करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने ईशान्येकडील मणिपूर राज्यातील अत्याचारात सहभागी असलेल्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच, पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान 15-16 लोक मारले गेल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील ग्रामीण निवडणुकांदरम्यान ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर दहशत पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. ते म्हणाले होते की, असा धोका असूनही लोकांनी भाजपच्या उमेदवारांना आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा वापर विरोधकांना धमकावण्याचे साधन म्हणून करण्यात आला. मात्र असे असतानाही बंगालच्या जनतेने आपल्या प्रेमामुळे लोक जिंकले आहेत.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचार