शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची मागणी

By admin | Updated: April 29, 2016 05:08 IST

मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी एक पाऊल टाकत गुरुवारी भारताने ब्रिटनकडे यासंदर्भात औपचारिक मागणी केली आहे.

नवी दिल्ली : कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर असताना विदेशात पळून गेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी एक पाऊल टाकत गुरुवारी भारताने ब्रिटनकडे यासंदर्भात औपचारिक मागणी केली आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली. नवी दिल्लीतील ब्रिटनच्या उच्चायुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. तर भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त हे ब्रिटनच्या विदेश आणि राष्ट्रमंडळ कार्यालयाला याबाबतचे पत्र देणार आहेत. मल्ल्यांविरुद्धच्या कारवाईची माहितीही देण्यात येणार आहे. मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनशी सतत संपर्क ठेवला जाईल, असेही विदेश मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तपास यंत्रणेला असहकार्य करत असल्याच्या कारणावरून सरकारने यापूर्वीच विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द केला आहे. तथापि, मल्ल्यांविरुद्ध आता अजामीनपात्र वॉरंट आहे.मल्ल्या हे २ मार्च रोजी भारतातून ब्रिटनला गेले होते. दरम्यान, सरकारने काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी सरकार ब्रिटनशी संपर्क साधून कार्यवाही सुरू करणार आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)विजय मल्ल्या यांच्याकडे बँकांचे ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. देशातील प्रमुख १३ बँकांच्या कर्जाचा यात समावेश आहे.