शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या आरोपींवर मोदींची कृपा!

By admin | Updated: May 16, 2016 04:44 IST

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या ताज्या आरोपपत्राने भारताची सचोटी व दहशतवादाविरुद्ध लढा देण्यातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे

नवी दिल्ली : २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या ताज्या आरोपपत्राने भारताची सचोटी व दहशतवादाविरुद्ध लढा देण्यातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे, असे सांगून या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी काँग्रेसने केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालेगाव प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्याचा आदेश देऊन आपली संविधानाची घेतलेली शपथ सार्थक ठरवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केले. ‘एनआयए’ ही आता ‘नमो तपासी संस्था’ (नमो इन्व्हेस्टीगेशन एजन्सी) बनली आहे, असा स्पष्ट आरोप करून शर्मा म्हणाले, मुंबई एटीएसचे प्रमुख (दिवंगत) हेमंत करकरे यांनी केलेला सखोल तपास मोडीत काढण्याच्या उद्देशानेच एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले आहे, असे दिसते. एटीएसने याआधी नोंदविलेले सर्व जाबजबाब आता निष्प्रभ ठरविण्यासाठीच एनआयएने आरोपींवरील ‘मकोका’चे आरोप मागे घेतल्याचे स्पष्ट होते.एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसह सहा आरोपींवरील ‘मकोका’ रद्द केला होता. एनआयएने अचानक ही भूमिका का घेतली, याचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत तपास करण्यात आला पाहिजे, अशी मागणी करून शर्मा म्हणाले, या घडामोडीमुळे भारताची अखंडता आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या कटिबद्धतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. करकरेंचे बलिदान व्यर्थ घालविण्याच्या उद्देशाने एनआयएने हा नवा पवित्रा घेतला आहे काय? आता मोदींनीच यात हस्तक्षेप केला पाहिजे. ।हा तर शहिदांचा अवमानमालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना क्लीन चिट देण्यामागे पंतप्रधान मोदींचाच हात आहे. हा एटीएस प्रमुख दिवंगत हेमंत करकरे यांच्यासारख्या शहिदांचा अवमान आहे.मोदी सरकार तपासात हस्तक्षेप करून एनआयएवर दबाव टाकत आहे. त्यामुळेच या प्रकरणातील आरोपींविरुद्धचा मकोका हटवून त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. यामुळे केवळ चुकीचा संदेशच जात नाही, तर भारताची विश्वसनीयताही कमी होत आहे. या गंभीर मुद्द्यावर मोदींनी मौन सोडावे, असेही शर्मा म्हणाले.मालेगाव खटल्यात झालेल्या घडामोडींवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधिज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाई करतील.- प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र