शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 06:25 IST

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे.

मुंबई : बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली परवानगी अवैध आहे. त्यामुळे आपल्यावर यूएपीएअंतर्गत केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने केलेल्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने ७ आॅगस्टपर्यंत तहकूब केली. गुरुवारच्या सुनावणीत पुरोहितच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्या. इंद्रजीत महंती व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला.

पुरोहितला कोणीतरी यामध्ये नाहक गोवले आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. ते निर्दोष असल्याचे मी सिद्ध करेन. त्यांची सन्मानाने या केसमधून निर्दोष म्हणून सुटका केली पाहिजे, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. पुरोहित भारतीय लष्करात काम करीत आहेत. ते कधीच अशा दहशतवादी कृत्यात सहभागी नव्हते. हिंदू दहशतवादी संघटनेशी त्यांचा कधीच संपर्क नव्हता, असेही रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. पुरोहितवर यूएपीए, स्फोटके कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या कायद्यांतर्गत पुरोहित व अन्य आरोपींवर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. १७ जानेवारी २००९ रोजी गृहविभागाच्या अतिरिक्त सचिवांनी त्याच्यावर कारवाई करण्यास दिलेली परवानगी बेकायदेशीर आहे. यूएपीएअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्यापूर्वी विशेष प्राधिकरण नेमणे आवश्यक आहे आणि ही समितीच आरोपीवर कारवाई करायची की नाही, याबाबत निर्णय घेऊ शकते. मात्र, पुरोहितवर कारवाई करण्यासाठी २००९ मध्ये परवानगी दिली आणि विशेष प्राधिकरण आॅक्टोबर २०१० मध्ये नियुक्त केले. त्यामुळे त्याच्यावर कारवाईसाठी दिलेली परवानगी बेकायदा असून यूएपीए अंतर्गत खटला भरू शकत नाही. पुरोहितच्या याचिकेवर एनआयएने आक्षेप घेतला. न्यायालयाने पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी ठेवली. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.खटला इन कॅमेरा चालवण्यासंदर्भात आज सुनावणीमालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीदरम्यान एनआयएने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयात हा खटला इन-कॅमेरा चालविण्यासाठी अर्ज केला. हा खटला इन-कॅमेरा चालविण्यात आला तर प्रसारमाध्यमांना या खटल्याला उपस्थित राहता येणार नाही. न्या. व्ही. ए. पडसाळकर यांनी या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय