शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नऊ जणांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करा

By admin | Updated: May 31, 2017 01:01 IST

झारखंडच्या कोल्हान भागात नऊ जणांची ठेचून हत्या करण्यात आली असून, या हत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने

जमशेदपूर : झारखंडच्या कोल्हान भागात नऊ जणांची ठेचून हत्या करण्यात आली असून, या हत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. १० मेनंतरच्या घडामोडींमध्ये या हत्या करण्यात आल्या.झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सुखदेव भगत यांनी राज्य पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीवर असमाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यातील सरकारने विश्वास गमावला आहे. १० मेपासून मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरतात, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. अखेर या अफवांमुळे पूर्व व पश्चिम सिंहभूम व सरायकेला-खरसावा जिल्ह्यांच्या कोल्हान भागांत ९ जणांचे प्राण गेले.मुलाचे अपहरण करण्याच्या अफवेनंतर १८ मे रोजी ३ जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबियांची भगत यांनी भेट घेतली.निर्दोष लोकांची हत्या करण्याच्या कारणांचा खुलासा करण्यासाठी या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या घटना पूर्वनियोजित होत्या व त्या सरकारी आशीर्वादाने झाल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेटही न घेतल्याबद्दल त्यांनी टीका केली. नगाडी येथील घटना समाजावर कलंक आहे आणि हा भाग मुख्यमंत्री रघुबर दास व राज्यमंत्री शरयू रॉय यांचा आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.या हत्या प्रशासनिक अपयशामुळे झाल्याचा आरोप करताना भगत यांनी म्हटले आहे की, पोलीस असोसिएशनने मुलांचे अपहरण करण्याच्या अफवांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले होते, तरीही अनेकांचे प्राण गेले. ते रोखण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल द्रौपदी मुरमू यांची भेट घेईल व या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करील. राज्यात हत्येच्या घटना घडत असताना राज्य सरकार हे नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वातील सरकारची त्रिवर्षपूर्ती साजरे करण्यात मश्गूल होते. पीडितांना मुख्यमंत्री भेटले नाहीत; परंतु शरणागती पत्करणाऱ्या नक्षलींचे गुणगौरव करण्यात त्यांनी धन्यता मानली, असा आरोपही भगत यांनी केला.