शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
5
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
6
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
7
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
8
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
9
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
10
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
11
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
12
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
13
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
14
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
15
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
16
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
17
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
18
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
19
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
20
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!

नऊ जणांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करा

By admin | Updated: May 31, 2017 01:01 IST

झारखंडच्या कोल्हान भागात नऊ जणांची ठेचून हत्या करण्यात आली असून, या हत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने

जमशेदपूर : झारखंडच्या कोल्हान भागात नऊ जणांची ठेचून हत्या करण्यात आली असून, या हत्यांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. १० मेनंतरच्या घडामोडींमध्ये या हत्या करण्यात आल्या.झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सुखदेव भगत यांनी राज्य पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीवर असमाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्यातील सरकारने विश्वास गमावला आहे. १० मेपासून मुलांच्या अपहरणाच्या अफवा पसरतात, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. अखेर या अफवांमुळे पूर्व व पश्चिम सिंहभूम व सरायकेला-खरसावा जिल्ह्यांच्या कोल्हान भागांत ९ जणांचे प्राण गेले.मुलाचे अपहरण करण्याच्या अफवेनंतर १८ मे रोजी ३ जणांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबियांची भगत यांनी भेट घेतली.निर्दोष लोकांची हत्या करण्याच्या कारणांचा खुलासा करण्यासाठी या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या घटना पूर्वनियोजित होत्या व त्या सरकारी आशीर्वादाने झाल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या कुटुंबियांची भेटही न घेतल्याबद्दल त्यांनी टीका केली. नगाडी येथील घटना समाजावर कलंक आहे आणि हा भाग मुख्यमंत्री रघुबर दास व राज्यमंत्री शरयू रॉय यांचा आहे, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.या हत्या प्रशासनिक अपयशामुळे झाल्याचा आरोप करताना भगत यांनी म्हटले आहे की, पोलीस असोसिएशनने मुलांचे अपहरण करण्याच्या अफवांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले होते, तरीही अनेकांचे प्राण गेले. ते रोखण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली नाहीत. काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल द्रौपदी मुरमू यांची भेट घेईल व या घटनांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करील. राज्यात हत्येच्या घटना घडत असताना राज्य सरकार हे नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वातील सरकारची त्रिवर्षपूर्ती साजरे करण्यात मश्गूल होते. पीडितांना मुख्यमंत्री भेटले नाहीत; परंतु शरणागती पत्करणाऱ्या नक्षलींचे गुणगौरव करण्यात त्यांनी धन्यता मानली, असा आरोपही भगत यांनी केला.