शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:40 IST

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे, या बैठकी अगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा जोरदार सुरू आहे.

देशात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. विरोधी पक्षांनीही तयारी केली असून, आता देशातील ३५ हून अधिक विरोधी पक्षांनी एकत्र येत I.N.D.I.A ची स्थापन केली. पहिली बैठक बिहारमध्ये तर दुसरी बैठक बंगळूरमध्ये झाली, आता तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. दरम्यान, या बैठकीअगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवा अशी मागणी होत आहे. 

१०० महिने लूट, नंतर २०० रुपयांची सूट! गॅस सबसिडीवरून अखिलेश यादवांनी हाणला टोला

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी ही मागणी केली आहे.कक्कर म्हणाल्या, " अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले पाहिजे." या महागाईतही देशाची राजधानी दिल्लीत महागाई सर्वात कमी आहे.दिल्लीत मोफत पाणी, मोफत वीज, मोफत शिक्षण, महिलांसाठी मोफत बस प्रवास, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे ते म्हणाले. असे असतानाही अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

कक्कर म्हणाल्या, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत आहेत आणि ते पंतप्रधान मोदींविरोधात आव्हानात्मक म्हणून समोर आले आहेत.

आप'च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या, मेक इंडिया नंबर 1 मिशन अंतर्गत, आम्हाला देशातच वस्तू बनवायला हव्या आहेत. पीएम मोदी लाल किल्ल्यावरून म्हणाले होते की, जेव्हा आपण वस्तू आयात करतो तेव्हा महागाई देखील आयात केली जाते. हे असे का होते, ते होत आहे कारण त्यांच्याकडे आर्थिक मिशन नाही. येथे उत्पादन मायनसमध्ये गेले आहे. 

'केजरीवाल यांच्या व्हिजनमध्ये भारत हे उत्पादन केंद्र बनणार आहे. जिथे लायसन्स राज संपेल. व्यापाऱ्यांना कामाचे वातावरण मिळेल. जिथे शिक्षण उच्च पातळीवर असेल तिथे मुले शोध घेण्याचा विचार करतील. शिक्षण अशा पातळीवर असेल की परदेशी मुले डॉलर खर्च करून शिकायला येतील. मोदी सरकारने काही व्यापाऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, कल्पना करा या पैशातून किती राज्यांना मोफत वीज मिळाली असती, असंही कक्कर म्हणाल्या. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप