शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उरी सेक्टरमध्ये जवानाकडून मेजरची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 11:39 IST

जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18- जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एका जवावाने त्याच सेक्टरमधील मेजरची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती समोर येते आहे. मंगळवारी ही घटना घडली. मोबाइल वापरण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादावरून झालेल्या गोळीबारात मेजरला गोळी लागल्याचं वृत्त आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. या घटनेची माहिती मिळतात सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मेजरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
 या घटनेत मृत्यू झालेल्या मेजरचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. शेखर थापा असं मृत्यू झालेल्या मेजरचं नाव आहे. 
आणखी वाचा
 

स्फोटकाचे नमुने आग्राला पाठवलेच नाहीत, उत्तर प्रदेश सरकारचं स्पष्टीकरण

स्मृती इराणी यांना माहिती व प्रसारण मंत्रिपद

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्युटीवर असताना जवानाला मोबाइल फोन वापरायला मनाई करण्यात आली होती. मेजरच्या या निर्णयामुळे नाराज असलेल्या जवानाने गोळी चालविल्याचं कळतं आहे. आरोपी जवान जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये तैनात आहे. गोळी लागल्याने मेजर थापा यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी जवावाने मेजरला मागून एके-47 मधून पाच गोळ्या झाडल्या. दरम्यान लष्कराने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मेजर शेखर थापा 8 राष्ट्रीय रायफल दलात तैनात होते. ज्या ठिकाणी मेजर ड्युटीवर तैनात होते ती जागा एलओसीपासून खूप जवळ आहे. या घटनेला लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ड्युटीवर असलेला जवान मोबाइल फोनचा वापर करत होता. त्याला बघून मेजर शेखर थापा यांनी त्या जवानाला हटकलं तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं. या मुद्द्यावरून दोघांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या धक्काबुक्कीत जवानाचा फोट तुटला. त्यामुळे दोघांमध्ये सुरू झालेला वाद टोकाला गेला होता. या कारणावरून त्या जवानाने मेजर थापा यांना गोळ्या मारल्या.

दरम्यान, या प्रकरणी लष्कराकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून मंगळवारी संध्याकाळपर्यंत लष्कर अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.