शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; आकाश मिसाईल, तीन लाख रोजगार, इथेनॉल उत्पादन वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 17:01 IST

Modi Cabinet decisions : भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची माहिती देताना सांगितले की, 7,725 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जवळपास तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्य़ात आली आहे. 

मंत्रिमंडळाने कृष्णपट्टनम आणि तुमकुरूच्या औद्योगिक वसाहतींमध्ये तसेच नोएडामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक केंद्राला परवानगी दिली आहे. कृष्णपट्टनम बंदरामध्ये 2139 कोटी रुपये खर्चून औद्योगिक क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. 

 

जावडेकर यांनी सांगितले की, दोन ट्रेड कॉरिडॉर बनविण्यात येणार आहेत. यामुळे मालाची वाहतूक चांगल्या प्रकारे होईल. या कॉरिडॉरला एक्स्प्रेस वे, बंदरे आणि रेल्वेसारख्या सुविधा आहेत, त्या शहरांचाही विकास केला जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने एस्टोनिया, पॅराग्वे आणइ डॉनिनिकन संघराज्यामध्ये भारतीय मिशन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. 

भूतान आणि भारतामध्ये झालेल्या सहकार्य करारालाही मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. देशाच्या पहिल्या पिढीच्या (1G) इथेनॉलच्या योजनेंतर्गत तांदूळ, गहू, मका, ऊस आदींपासून इथेनॉल बनविण्यात येणार आहे. यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी केंद्राने 4,573 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. 

पॅरादीप पोर्टसाठी मोदी सरकारने 3000 कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे जागतिक स्तरावरील बंदर उभारले जाणार आहे. याचबरोबर डीआरडीओने बनविलेल्या आकाश मिसाईच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. ही मिसाईल भारतीय सैन्याला दिलेल्या मिसाईलपेक्षा वेगळी असणार आहे. या आकाश मिसाईलची रेंज 25 किमी आहे. 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकर